Citizens worried उष्णतेच्या लाटेत शहरासह जिल्ह्यातील नागरिक होरपळून निघत आहेत. त्यातच सतत खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे येथील नागरिक अधिकच हैराण झालेत. वीज खंडित होण्याचे प्रमाण ग्रामीण विभागात सर्वाधिक आहे. कधी कधी दिवसभर गेलेली वीज रात्री तीन-चार तासांसाठी येते. मान्सूनपूर्व दुरुस्ती, झाडांच्या छाटणीच्या कामामुळे वीजपुरवठा खंडित करत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.
मान्सूनचे आगमन होण्यास अद्याप दोन महिने शिल्लक असताना महावितरण कंपनीने कधीच इतकी तत्परता दाखवलेली नव्हती. त्यामुळे शहरी भागातील वाढती मागणी पुरवण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात अघोषित भारनियमन सुरू केले की काय, अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात काही दिवसांपासून 40 अंशावर कमाल तापमानाची नोंद होत आहे. अतिरिक्त भार वाढत असल्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचा दावा महावितरण करीत आहे. तर वाढलेल्या उष्णतेमुळे विद्युत रोहित्रांमधील तेल कमी होणे, काही यंत्रे नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत असल्याने दुरुस्तीची कामे वाढली असल्याचे कंपनीच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळ, दुपार, सायंकाळ, रात्री अपरात्री वीजपुरवठा खंडित होत आहे.Citizens worried काही भागात तर कायमच वीज गायब होत असल्याच्या तक्रारी आहेत. सकाळच्या वेळेत नागरिकांची कामावर जाण्याची गडबड आणि त्यात वीज गेल्याने कामे खोळंबून पडत आहे. दुपारी पुरवठा खंडित होत असल्याने उकाड्यात वाढ होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हैराण होत आहेत. ऐन उन्हाळ्यात दुपारच्या वेळेत विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.