- मुख्यमंत्री शिंदेंचे शरसंधान
मुंबई,
आमचा राजकारणातील जेवढा अनुभव आहे ना, तेवढे तुमचे वयदेखील नाही, अशा शब्दांत CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला. राज्यातील सत्तांतरामुळे भ्रमिष्ट आणि सैरभैर झालेले आता बेछूट आरोप करीत असल्याची टीकाही शिंदे यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर केली. हिंगोली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी वसमत येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले, ज्यांचे वय नाही, ते आता सैरभैर होऊन आरोप करीत आहेत. सत्ता गेल्याने ते भ्रमिष्ट झाले आहेत, मला नीच म्हणाले. एका शेतकर्याच्या मुलाला शिवी दिली. हा मराठा समाजाचा अपमान आहे. त्याचे उत्तर हा समाज मतपेटीतून देईल.
CM Eknath Shinde : राज्याच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले. हे सरकार अहोरात्र काम करणारे आहे. काही भागांत गारपीट, अवकाळी पाऊस सुरू आहे. निवडणूक असली तरी शेतकर्यांचे नुकसान भरून देण्याचा आदेश संबधित अधिकार्यांना दिला आहे. शासनाने आतापर्यंत 15 हजार कोटी रुपये नुकसान भरपाई दिली असून, शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. संविधान बदलणार या भूलथापा सुरू आहेत. संविधान कुणी बदलू शकत नाही. बाबासाहेबांचा अपमान काँग्रेसने केला. त्यांचा निवडणुकीत परभाव केला. त्यामुळे काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक समाजाला सोबत घेतले
विरोधकांकडून मुस्लिम समाजाला घाबरवले जात आहे. मात्र, माझे जिवाभावाचे कार्यकर्ते हे मुस्लिम बांधव आहेत. माझ्या गाडीचे सारथी मुस्लिम आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मुसलमानांना मिळतो. काँग्रेसने मुस्लिम आणि दलितांना केवळ व्होट बँक म्हणून वापरले. आम्ही प्रत्येक समाजाला गुण्यागोविंदने सोबत घेऊन पुढे जात आहोत, असे CM Eknath Shinde शिंदे म्हणाले.