पुलगाव
Vrahad voting नदीच्या विटाळा गावामध्ये बाबुराव शंकरराव ढाळे यांचे चिरंजीव गौरव याचा विवाह भद्रावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे. मतदानाच्या दिवशी विवाह असल्यामुळे गावातील सर्व मतदार मतदान न करताच विवाहाला जाणार होते. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी डाहे परिवाराला सर्व मतदारांचे मतदान करूनच विवाह साठी निघण्याचे आवाहन केले.
या आवाहनाला प्रतिसाद देत. डाहे परिवाराने व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक अरविंद हलमारे, तालुका कार्यवाह मनोज राऊत, तालुका सहकार्यवाह सतीश तांबुसकर यांनी प्रयत्न करून संपूर्ण गावातील मतदारांचे मतदान करून घेतले. त्यानंतरच वरात रवाना झाली. देशाच्या भवितव्यासाठी मतदान किती महत्त्वाचे आहे.Vrahad voting याचे महत्त्व जाणून विटाळा येथील मतदारांनी आधी लगिन लोकशाहीचे या बाण्याने मतदानाला महत्व दिल्याने डाहे परिवार व विटाळा वासियांचे कौतुक होत आहे.