भविष्यातील पदवी शिक्षणाचे स्वरूप;कसे आहे, कसे असावे?

Education in India-AI अवांतर विषयातील समस्या

    दिनांक :15-May-2024
Total Views |
शिक्षण
 
 
 
- डॉ. विजय पांढरीपांडे
Education in India-AI सध्या एआय, एमएल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यामुळे जग कसे बदलणार? नोकऱ्या कशा जाणार? बेरोजगारी वाढणार, अशी चर्चा होते आहे. Education in India-AI आता तंत्रज्ञानामुळे होणारे बदल अपरिहार्य मानले पाहिजेत. त्यासाठी तयार राहिले पाहिजे. या लेखनाचा विषय वेगळाच आहे; जो शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. शैक्षणिक धोरणाशी संबंधित आहे. Education in India-AI एआय, एमएलची तुतारी वाजताच आपला तंत्र शिक्षण विभाग जागा झाला. जिथून ही सूत्रं हलविली जातात, त्या दिल्लीतील एआयसीटीई अधिकारी कामाला लागले. या दोन विषयांत स्वतंत्र पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचे सूतोवाच करण्यात आले. Education in India-AI आपल्या राज्यातील राजकारणी मंडळींच्या अधिपत्याखालील खाजगी शिक्षण संस्था उत्साहाने कामाला लागल्या. कारण, नवा कोर्स म्हणजे अधिक प्रवेश संख्या, अधिक तुकड्या अन् भरपूर करोडोची डोनेशनद्वारे कमाई... असे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा मूर्खपणा जगात कुठल्याही विद्यापीठात बघायला मिळत नाही. Education in India-AI बहुतेक ठिकाणी अजूनही इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स अशा मूळ विषयातच पदव्या दिल्या जातात.
 
 

Education in India-AI
 
 
 
असाच चुकीचा व्यापारी निर्णय काही दशकापूर्वी याच एआयसीटीईने घेतला होता. त्यावेळी आयटी बूम होती. ‘वाय टू के' नावाच्या समस्येने धुमाकूळ घातला होता. अनेक संगणक पदवीधरांची गरज होती देशात आणि देशाबाहेरदेखील. तेव्हा आयटीची स्वतंत्र पदवी सुरू झाली. एमसीएसारखे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले. Education in India-AI मूलभूत इलेक्ट्रॉनिक्सची पदवी होतीच. जोडीने कॉम्प्युटर सायन्सचा वेगळा विभाग, स्वतंत्र पदवी झाली. पण आयटी बूमचा फायदा घेत त्यावेळी खाजगी संस्थांच्या जागा वाढविण्यासाठी हास्यास्पद प्रयोग झाले. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, आयटी, कम्युनिकेशन या अनेक शब्दांपैकी एका वेळी वेगवेगळे दोन शब्द वापरून अनेक नावांनी पदव्या निर्माण झाल्या. या हास्यास्पद प्रकारात एआयसीटीई बरोबर त्या त्या राज्यातील टेक्निकल विद्यापीठांनी साथ दिली. प्रवेश संख्या हजारोंनी वाढली. त्यामुळे खाजगी संस्थांचे, व्यवस्थापनाचे उखळ पांढरे झालेच; पण इतर परवानग्या देणाऱ्या संस्थांनीही वाहत्या पाण्यात हात धुवून घेतले. Education in India-AI त्या काळापासून इंजिनीअरिंग शिक्षण क्षेत्रात संख्या विरुद्ध गुणवत्ता असे शीतयुद्ध सुरू झाले. पिठाच्या गिरणीतून पीठ बाहेर पडावे तसे या खाजगी इंजिनीअरिंग कॉलेजातून आयटी, संगणक इंजिनीअर बाहेर पडू लागले.
 
 
 
इतर कोर्सेसच्या तुलनेत यांना कॉल सेंटरसारखे जॉब मिळणे सोपे झाले. अनेकांनी परदेशाची वाट धरली. तिकडे अमेरिकेच्या तुलनेत कमी पगार असला, तरी विनिमय दराने गुणले तर रुपयातला पगार लाखात! याचा दोन्ही पक्षी फायदा झाला. इलेक्ट्रॉनिक्स, आयटी हे विषय नोकरीच्या बाजारात सदैव जादा भाव देणारे, हे सत्य नाकारता येत नाही. या मृगजळाचा फायदा सर्वांनीच घेतला. सिव्हिल, मेकॅनिकलची मंडळी पदवीनंतर संगणक क्षेत्राकडे वळली. Education in India-AI आता यात आयटीच्या सोबतीने एआय, एमएल, डेटा सायन्स या विषयांची भर पडली. हे असे जनरल शिक्षणाकडून ‘नॅरो स्पेशलायझेशन'कडे जाणे भविष्याच्या दृष्टिकोनातून कितपत योग्य आहे, हा खरा विचाराचा मुद्दा आहे. पूर्वी आपली शिक्षण पद्धत त्रिकोणासारखी होती. आधी पायाभूत सर्व विषय शिकायचे. जसे जसे वय वाढते तसे पदवीनंतर विशिष्ट विषयाचे (पदव्युत्तर स्पेशलायझेशन) शिक्षण घ्यायचे. नंतर अधिकाधिक अरुंद गल्लीत प्रवेश करीत ‘सुपर स्पेशालिस्ट' व्हायचे. मेडिकलचे शिक्षण याचे उत्तम उदाहरण. आताचे अरुंद स्पेशल विषयातल्या पदव्या हेही याच प्रकारात मोडणारे! असे पदवीधर विद्यार्थी नव्या क्षेत्राचा, अवांतर विषयातील समस्यांचा सामना करण्यात अयशस्वी ठरण्याची शक्यता असते.
 
 
 
Education in India-AI आपण भविष्यातील गरजा, तंत्रज्ञानाचा विस्तार अन् वेग, नवी आव्हाने, समस्यांचे गुंतागुंतीचे स्वरूप हे सारे लक्षात घेतले तर शिक्षण, अभ्यासक्रम, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे स्वरूप याचा नव्याने विचार करावा लागेल. हा आकार त्रिकोणाऐवजी चौकोनी हवा. म्हणजे विद्यार्थ्याला सर्व विषयाचे थोडे थोडे ज्ञान हवे. एकाच विषयाचे सखोल ज्ञान उपयोगाचे ठरणार नाही. भविष्यातील सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, तांत्रिक विस्ताराचे स्वरूप लक्षात घेतले तर इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, आयटी, एआय यांच्या सोबतीने बायो टेक, नॅनो टेक, जेनेटिक, नुरल नेटवर्क या विषयाचे थोडे थोडे ज्ञान गरजेचे आहे. याशिवाय मानव्य शाखा, कला, संस्कृती, व्यवस्थापन, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र याचेदेखील आकलन हवे. अभ्यासक्रम ठरवताना असा इंटिग्रेटेड, आंतरशाखीय विचार केला पाहिजे. Education in India-AI सुदैवाने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात हे सहज शक्य आहे. यात मेजर-मायनर ही संकल्पना आहे. आता इंजिनीअरिंग पदवीचा विचार केला तर वेगवेगळ्या विभागाची वेगळी पदवी न देता ‘बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग' ही एकच पदवी राहू शकते. शिकताना विद्यार्थ्याला कोणते विषय घ्यायचे, कशात जास्त शिकायचे हे निवडीचे स्वातंत्र्य राहील. उदा. एखादा विद्यार्थी ६० टक्के क्रेडिटस् इलेक्ट्रॉनिक्सचे अन् बाकीचे मायनर क्रेडिटस् आयटी, एआय, मॅनेजमेंट, फायनान्स अशा विषयाची निवड करू शकेल.
 
 
 
Education in India-AI विद्यार्थ्याचे ‘क्रेडिट ग्रेड कार्ड' ही त्याची कुंडली असेल. ते पाहून तो कुठल्या जॉबसाठी उपयुक्त आहे, हे समजू शकेल. हेच तत्त्व इंजिनीअरिंग पदवीपुरते मर्यादित न राहता इतर पदवी विभागासाठी वापरता येईल. विज्ञानात एखादा विद्यार्थी मेजर क्रेडिट ६०-६५ टक्के फिजिक्सचे घेईल अन् बाकीचे मायनर क्रेडिट आवडीप्रमाणे केमिस्ट्री, संगणक, आयटी, गणित, संख्याशास्त्र अशा कुठल्याही विषयाचे घेईल. हीच पद्धत कला पदवीसाठी लागू होते. यामुळे शिक्षण एकांगी न राहता ते आंतरशाखीय स्वरूपाचे होईल. भविष्यासाठी, नोकरीच्या दृष्टीने आपली उपयुक्तता वाढविण्यासाठी आता हेच गरजेचे आहे. केवळ विद्याथ्र्यांनीच नव्हे, तर पालकांनीही हे समजून घ्यायला हवे. Education in India-AI अगदी शिकले-सवरलेले पालकदेखील आताशा अनभिज्ञ असतात. काही विद्यापीठे, काही संस्था बी. ई. अशी पदवी देतात तर काही बी. टेक. अशी पदवी देतात. या दोन पदव्यांत नेमका फरक काय? कॉम्प्युटर सायन्समध्ये सायन्स शिकवतात की इंजिनीअरिंग? एआय, एमएलसारखे सुपर स्पेशलायझेशन पदवीसाठी गरजेचे आहे का? भविष्यातील उद्योग क्षेत्राला नेमकी कशाची गरज आहे, असे प्रश्न पालकांना पडत नाहीत. ते अभ्यासक्रम ठरविणारे शिक्षणतज्ज्ञ विचारात घेत नाहीत. हे वैचारिक दारिद्र्य चिंतेचा गंभीर विषय आहे. त्यासाठी आताच खडबडून जागे झालेले बरे!
७६५९०८४५५५