मुलींना तंत्रज्ञान क्षेत्रात पूर्ण हक्क, समान वाटा मिळावा- ईशा अंबानी

    दिनांक :15-May-2024
Total Views |
Isha Ambani ‘गर्ल्स इन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (GICT) इंडिया – 2024’ दूरसंचार विभाग आणि संयुक्त राष्ट्र एजन्सीने संयुक्तपणे आयोजित,
चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या या डिजिटल युगात भारताला जागतिक नेता म्हणून उदयास यायचे असेल तर मुलींना पुढे आणावे लागेल. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि माहिती व संपर्क तंत्रज्ञान या क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढवावा लागेल. दूरसंचार विभागातर्फे आयोजित ‘गर्ल्स इन आयसीटी इंडिया – 2024’ या कार्यक्रमात मुलींशी बोलताना, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालिका ईशा अंबानी यांनी त्यांना करिअर म्हणून तंत्रज्ञान स्वीकारण्यास प्रोत्साहित केले. ईशा म्हणाली, तंत्रज्ञान क्षेत्रात महिला आणि पुरुषांचे प्रमाण समान असले पाहिजे. यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
isha ambani 
 
वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल सिंग निवडणूक लढणार!  'गर्ल्स इन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (GICT) इंडिया - 2024' चे आयोजन दूरसंचार विभाग - भारत सरकार, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (दक्षिण आशिया), इनोव्हेशन सेंटर - दिल्ली आणि इतर यु एन एजन्सी यांनी संयुक्तपणे केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना ईशा अंबानी म्हणाल्या की, “सरकार आवश्यक सुधारणा करत आहे आणि त्याचे परिणामही दिसत आहेत. गेल्या दशकात तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांचे प्रतिनिधित्व 6% ने वाढले आहे, परंतु उद्योगाने देखील आपली भूमिका करणे आवश्यक आहे.Isha Ambani  त्यांना अशा पद्धती आणि माध्यमे तयार करावी लागतील ज्यामुळे महिलांच्या करिअरमध्ये स्थिरता येईल. एकत्रितपणे, आपण असे भविष्य घडवू शकतो जिथे आपल्या मुलींना उद्याचे नेते बनण्याची समान संधी असेल. ईशा अंबानीने तिची आई नीता अंबानी यांचा उल्लेख करताना सांगितले की, तिने वारंवार सांगितले आहे की, "पुरुषाला सशक्त बनवा आणि तो एका कुटुंबाचे पोषण करेल. तर एक महिला सक्षम झाली तर ती संपूर्ण गावाला सक्षम करेल ." त्या पुढे म्हणाल्या, "महिला जन्मतःच नेत्या आहेत असे मला वाटते.  भारताचा पुन्हा एक शत्रू पाकिस्तानात ठार