- लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली,
‘उद्भव’ प्रकल्पांतर्गत भारतीय लष्कर महाभारत युद्ध, प्रतिष्ठित लष्करी व्यक्तींच्या शौर्यगाथा आणि मुत्सद्देगिरीतील भारताचा समृद्ध वारसा यावर संशोधन करीत आहे. देशाचे संरक्षण क्षेत्र बळकट करणे हा याचा उद्देश आहे, असे प्रतिपादन Army Chief General Manoj Pandey लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मंगळवारी केले.
‘भारतीय सामरिक संस्कृतीतील ऐतिहासिक प्रणाली’ या परिषदेत लष्करप्रमुख बोलत होते. जनरल पांडे म्हणाले की, ‘उद्भव’ प्रकल्पाचे उद्घाटन गेल्या वर्षी करण्यात आले होते. यात वेद, पुराण, उपनिषद आणि अर्थशास्त्र यासार‘या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करत आहे आणि प्र‘यात भारतीय आणि पाश्चिमात्य विद्वानांमधील उल्लेखनीय बौद्धिक समानता प्रकट केली आहे.
आधुनिक सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक अद्वितीय आणि सर्वांगीण दृष्टिकोन निर्माण करून, समकालीन लष्करी पद्धतींसह प्राचीन ज्ञानाची सांगड घालणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. हा भारतीय लष्कराचा एक उपक‘म आहे, ज्याचा उद्देश समकालीन लष्करी अध्यापनशास्त्राशी जुने ज्ञान एकत्रित करणे आहे.
Army Chief General Manoj Pandey लष्करप्रमुख पांडे म्हणाले, या प्रकल्पात वेद, पुराणे, उपनिषद आणि अर्थशास्त्र या प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे भारताच्या आदिवासी परंपरा, मराठा नौदल वारसा आणि लष्करी व्यक्तींचे, विशेषत: महिलांची शौर्यगाथा अधोरेखित करून नवीन क्षेत्रांमध्ये शोध घेण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.
उद्भव प्रकल्पाचा उद्देश
उद्भव प्रकल्पाचा उद्देश प्राचीन ज्ञानाला आधुनिक लष्करी अध्यापनशास्त्राचा भाग बनवणे आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लष्कराने सध्या एक पुस्तिका तयार केली आहे. त्यात समाविष्ट केलेली सर्व वाक्ये प्राचीन ग्रंथातून घेतली आहेत. असे मानले जाते की, भारताची संस्कृती, वारसा, लष्करी इतिहास, मुत्सद्दीपणा आणि रणनीतीमध्ये आश्चर्यकारक खजिना दडलेला आहे. हे सर्व जाणून घेऊन समजून घेतल्यानंतर वर्गखोल्यापासून मैदानापर्यंत प्रशिक्षणादरम्यान त्याची अंमलबजावणी केली जाईल. हे सर्व अधिकारी आणि सैनिकांच्या प्रशिक्षणाचा एक भाग असेल.