दहावी बोर्डाचा निकाल जाहीर...असा बघा निकाल

    दिनांक :27-May-2024
Total Views |
मुंबई, 
10th board result महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल  जाहीर झाला. यावेळी राज्याचा दहावीचा निकाल 95.81 टक्के लागला. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी निकालात अधिक आहे. दहावीचे विद्यार्थी हे दुपारी एक वाजता निकाल पाहू शकणार आहेत. आज ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होईल. यंदाच्या निकालात कोकण विभाग हा अव्वल ठरलाय. कोकण विभागाचा निकाल तब्बल 99 टक्के लागला आहे.
 
gajers 
 
ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे. यासाठी https://mahresult.nic.in/https://mahahsscboard.in/mr या साईटवर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता. चाैकोनमध्ये तुम्हाला परीक्षा क्रमांक आणि दुसऱ्या चाैकोनमध्ये आईचे नाव टाकायचे आहे. 10th board result यानंतर विद्यार्थ्यांनी सबमिटचे बटन दाबा. तुमच्यासमोरील स्क्रिनवर तुमचा निकाल असेल. बरोबर दुपारी एक वाजता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा निकाल हा पाहू शकता. यंदा राज्याच्या निकालाच्या टक्केवारीत देखील वाढ झालीये. सर्वाधिक कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागलाय. पुणे विभागाच्या विद्यार्थ्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे.
  • या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४९,३२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,८४,४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ आहे.
  • या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,७७० पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३२७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,९५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ५१.१६ आहे.
  • या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,८९४ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी २०,४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.४२ आहे.
  • या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ९१४९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९०७८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी ८४६५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.२५ आहे. 
  • या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, पुनर्परिक्षार्थी व खाजगी मिळून एकूण १६,११,८१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६,००,०२१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,१७,८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.८६ आहे.
  • सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९९.०१%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९४.७३%) आहे.
  •  सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.२१ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा २.६५ ने जास्त आहे.
  • एकूण १८ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.
  • राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५,५८,०२१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ५,३१,८२२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,१४,८६६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ७९,७३२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
  • राज्यातील २३,२८८ माध्यमिक शाळांतून १५,६०,१५४ नियमिGत विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,३८२ शाळांचा निकाल १०० % लागला आहे.