पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ केव्हा करणार?

-न. प. प्रशासनास नागरिकांचा प्रश्न -आरोग्य धोक्यात

    दिनांक :07-May-2024
Total Views |
मूर्तिजापूर,
water tank शहराला नगर पालिका प्रशासनातर्फे पाणी पुरवठा केला जातो. शहरात पिण्याच्या पाण्याच्या तीन टाक्या आहेत. या तिन्ही ठिकाणावरून शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येते. पण या टाक्या मागील सात ते आठ वर्षांपासून स्वच्छ केल्या नसल्याने शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. अशी तक्रार माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक द्वारकाप्रसाद रामदास दुबे यांनी पालकमंत्र्यांकडे व जिल्हाधिकार्‍यांडे केली आहे.

dfdf
शहरातील गोयनका नगर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर व खदान, जुनी वस्ती, नवीन घरकूल या तीन ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यावरून शहरातील जुनी वस्ती व स्टेशन विभाग परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा नगर परिषदेतर्फे पाणी पुरवठा करण्यात येते. पण या टाक्यामागील सात ते आठ वर्षांपासून स्वच्छ केल्याचं नसल्याने या टाक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व पावडर जमा झाली असून कोणत्याही परिस्थितीत या टाक्याची स्वच्छता करणे आवश्यक झाले आहे, असे दुबे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
गोयनका नगर परीसरातील टाकी ही सन 1975 साली बांधण्यात आली असून ही टाकी जिर्ण झालीअसून तिथेच एक नवीन टाकी निर्माण करणे आवश्यक आहे. गोयनका नगरच्या टाकीवरून वाया जाणारे पाणी जलवाहिनी टाकून जुनी वस्तीतील खदानीत आणुन टाकावे जेणे करून मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, असेही त्यांनी यात नमूद केले आहे.drinking water tank
शहरात अनेक ठिकाणी लिकेजेस मुळे हजारो गॅलन पाण्याचा अपव्यय होत आहे. गोयनका नगर येथून जुनी वस्ती मोरारजी चौकापर्यंत 2 कोटींची नवीन पाईप टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी लवकर सुरू करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.