बिनागुंडा येथील धबधब्याखाली बुडून दोघांचा मृत्यू

पाच दिवसापूर्वी नवनीतचा झाला होता विवाह

    दिनांक :12-Jun-2024
Total Views |
अहेरी,
binagunda waterfall भामरागड तालुक्यातील निसर्गरम्य बिनागुंडा येथील राजिरप्पी धबधब्याखाली आंघोळीसाठी उतरलेला नवनीत राजेंद्र धात्रक (27) रा. चंद्रपूर हा खोल पाण्यात बुडाल्याने त्याला वाचविण्यास गेलेले ग्रामसेवक बादल शामराव हेमके (39) रा. आरमोरी या दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 

fdgdgd 
 
भामरागड पंचायत समिती अंतर्गत पल्ली ग्रामपंचायमध्ये कार्यरत ग्रामसेवक बादल हेमके व त्याचा नातलग नवनीत धात्रक हे कुटुंबासह बिनगुंडा धबधब्यावर 11 जून रोजी मंगळवारी सहलीसाठी गेले होते. नवनीत धात्रक यांचा गेल्या आठवड्यात 7 जून रोजी विवाह झाला. नवविवाहित दांपत्य लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी बिनागुंडा धबडब्यावर गेले होते. मात्र काळाचा घात झाला. आंघोळीसाठी धबधब्याखालच्या पाण्यात उतरलेले नवनीत धात्रक खोल पाण्यात बुडायला लागल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ग्रामसेवक बादल हेमके याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतक धात्रक व हेमके या दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांनाही जीव गमवावा लागला. यावेळी घटनास्थळावर दोघांचेही कुटूंब उपस्थित होते. मात्र यातील कोणालाही पोहता येत नसल्याने त्या दोघांना वाचविण्यासाठी कोणीही धजावले नाहीत.binagunda waterfall घटनेच्या माहितीवरून लाहेरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दोघांचेही मृतदेह ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे पाठविले. घटनेचा पुढील तपास लाहेरी पोलिसांकडून केला जात आहे
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहानी
चंद्रपुरात नोकरीस असलेल्या नवनीतचा विवाह गडचिरोली येथील मयुरी कापकर हिच्याशी मागील आठवड्यात झाला होता. दोघांनीही आपल्या संसाराची स्वप्ने रंगविली होती. मात्र नियतीला काही औरच मंजूर होते. दोघात संसार सुरू होण्याआधीच नवनीतच्या अशा अकाली जाण्याने नवविवाहीता मयुरीवरसह नातलगावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.