वारकरी व्हा gajanan maharaj palkhi आणि प्रत्यक्ष डोळ्याने पंढरी पहा. बाकीचे साधने काय करायची आहे?सर्व काही फळ यानेच मिळते.असे केल्याने अभिमान नाहीसा होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात डोळ्यांमध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्येय येतो. सकाळी ७ वा. शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी मंदिरामधून ७०० वारकऱ्यांसह हजारो भाविक भक्तांच्या सहभागाने राजवैभवी थाटात आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे. संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने टाळ मृदंगासह हरिनामाचा नामघोष संत नगरी दुमदुमली आहे. आज गुरुवार रोजी वारीला येणारे भाविक व विदर्भ, खान्देशातील, मराठवाडा, मुंबई, पुणे, नागपूर,येथील श्रींचे भाविक आपल्या श्री गजानन माऊली श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशीच्या वारीला माऊली जात असल्याने माऊली दर्शन घेऊन श्री क्षेत्र नागझरी येथे पर्यंत पायीं वारी करुन माऊलीच्या पालखीला निरोप दिला.
श्रींच्या पालखी gajanan maharaj palkhi मार्गावर आकर्षक अशा रांगोळी काढण्यात आले तर शहरातील सेवाभावी संस्थांनाच्या वतीने,चहा,पाणी, मंठा ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. श्रीं ची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ,उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने ३३ दिवसा पायीवारी करीत एकूण ७५० किलोमिटर प्रवास करती दि.१५ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींच्या पालखी मुक्कामास पोहचेल. ५ दिवसापर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्कामास राहील. आणि आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर दि.२१ जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगांवकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. दि ११ ऑगस्ट २०२४ रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगावला परत येईल.