बुलडाणा,
Dr. Shon Chinchole : अण्णाभाऊ साठे यांचे विचार विविध अंगी आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहून या शिवभक्तने रशियामध्ये गायला. प्रचंड मोठ्या साहित्याची निर्मिती केली. यातून शोषित वर्गाचे दुःख त्यांनी मांडलेच आहे पण त्याच बरोबर मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमानही जपला. त्यांचे विचार तरुण पिढी पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. असे मत लोकमंच बुलढाणा चे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले यांनी व्यक्त केले.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व दिवंगत ज्येष्ठ लेखक जी ए.उगले यांना लोकमंच परिवाराच्या वतीने चिंचोले चौक येथे दि. 18 जुलै रोजी अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. शोन चिंचोले होते. याप्रसंगी सुनील सपकाळ, गणेश निकम, डी आर इंगळे, गणेश सिंग राजपूत, गणेश बस्सी, सोहम घाडगे,संजय खांडवे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. शोन म्हणाले अण्णाभाऊ साठे सामान्य परिस्थितीतून आलेले हे व्यक्तिमत्व जगाच्या काण्याकोपर्यामध्ये विस्तारित झाले. त्यांनी मानवतावादी नवा विचार दिला. हा विचार नवीन पिढीमध्ये रुजला पाहिजे. असे सांगून त्यांनी अण्णाभाऊंच्या कार्यावर प्रकाश टाकला.
सुनील सपकाळ यांनी प्रस्ताविकात अण्णाभाऊ साठे म्हणजे मराठी साहित्यातील अजरामर व्यक्तिमत्व असून त्या नावाशिवाय मराठीचे दालन पूर्णच होऊ शकत नाही असे व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय दिला. सुरेश साबळे यांनी अण्णाभाऊ साठे व दिवंगत साहित्यिक जीए उगले यांना आदरांजली व्यक्त केली. अण्णाभाऊ साठे यांचा विचार हा महाराष्ट्र घडवणारा विचार असल्याचे साहित्यिक साबळे म्हणाले. या नंतर सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली संचलन गोपालसींग राजपूत तर आभार संजय खांडवे यांनी मानले.