महाराष्ट्रात पावसाचा सर्वत्र कहर!

25 Jul 2024 10:50:00
मुंबई,
Maharashtra rains everywhere राज्यात गुरुवारी सर्वत्र पावासाचा धुमाकूळ सुरु आहे. मुंबईसह उपनगरात पावसाने कहर केलाय. रात्रीपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. यामुळे लोकल ट्रेनवर परिणाम झालाय. दरम्यान ठाणे, पालघरमधील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्यातील काही भागात अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे पालघर जिल्ह्यातील वाडा विक्रमगड तालुक्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला आहे. एकंदरीत राज्यातील पावसाचा मोठा परिणाम जनजीवनावर झाला आहे.
हेही वाचा : बाबा, माझे शूज घसरत आहे...आणि 
 

meraaj 
 
पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कल्याण नगर मार्गावरील रायते पुलाला नदीचे पाणी लागले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उल्हास नदीच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कल्याण नगर मार्गावरील रायते पुलावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. Maharashtra rains everywhere पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून या भागातील नद्या ,ओढे ,नाले दुथडी भरून वाहत आहे तर जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील खेड,आंबेगाव,जुन्नर येथील घाटमाथ्यावरील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. सांगली, ठाणे जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी दिली गेली आहे.
वर्धा नदीला पूर, महामार्ग बंद, गोंदिया तलाव ओव्हर फ्लो
सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावणाऱ्या वर्धा नदीला पूर आला आहे. यामुळे राळेगाव- वरोरा महामार्ग बंद झाला आहे. वाहतूक ठप्प झाली आहे. पुलावरून 4 फूट पाणी वाहत आहे. चिंच मंडल , Maharashtra rains everywhere दापोरा येथील नदी काठच्या शेतात पाणी शिरले आहे. सततच्या पावसामुळे गोंदियातील बांध तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. तलावाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व भागात पावसाची संततधार सुरुच आहे. गेली 8 दिवस नॉन स्टॉप पावसाची बॅटिंग सुरू असल्यामुळे वारणा आणि कोयना पाणलोट परिसरात सतत पाऊस सुरू आहे. चांदोली आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या सांगली कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 31फूट 8 इंच आहे.
पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
पंचगंगा नदीने धोका पातळी गाठल्यानंतर आता नदीकाठच्या गावांना फटका बसायला सुरुवात झाली आहे. आंबेवाडीतून चिखलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. Maharashtra rains everywhere मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर आंबेवाडी आणि चिखली या दोन्ही गावांना सर्वाधिक फटका बसत आहे. इचलकरंजीमधील पंचगंगा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर आले आहे. यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राधानगरी धरण 94 टक्के भरले आहे. शहरातील बागवानपट्टी शेळके मळा परिसरात पुराचे पाणी येऊ लागले. इचलकरंजी कर्नाटकची जोडणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला आहे.
हेही वाचा : पती-पत्नीमध्ये झाला वाद, चढले हाय टेंशन टॉवरवर, VIDEO 
पवना नदीचे पाणी वाढले
पिंपरी चिंचवड शहरासह पवना धरण क्षेत्रामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळे पवना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. शहराच्या काही भागांमध्ये पवना नदीचे पाणी रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नदी काठच्या काही भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. Maharashtra rains everywhere मुंबईच्या ऊपनगरीत पावसाची दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. इस्टर्न हायवे, वेस्टर्न हायवे वाहतूक ठप्प झाली आहे. ‘मॅक्सिमम सिटी’ मुंबईच्या अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, पुण्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर राहणार आहे. मुंबईतील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 28 आणि २24 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.  हेही वाचा : कावड यात्रेतील नावाचा मुद्दा अमेरिकेत पोहोचला!
Powered By Sangraha 9.0