नवी दिल्ली,
पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना Yogi Adityanath मुख्यमंत्री म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी मोदीजींवर विश्वास ठेवला आणि 500 वर्षांची अयोध्येची समस्या जणू काही समस्याच नसल्यासारखी सुटली." योगी पुढे म्हणाले की, काँग्रेसचे नाव हेच समस्या आणि भाजपचे नावच त्यावर उपाय आहे.
हेही वाचा : 2025-26 सत्रापासून इयत्ता 1 ते 8 पर्यंत नवीन पुस्तके होणार लागू
जम्मू-काश्मीरच्या रामगड विधानसभा मतदारसंघात Yogi Adityanath एका जाहीर सभेला संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस पाकिस्तान समर्थित पक्षांसोबत असून त्यांचा खरा चेहरा आरक्षणविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. योगी आदित्यनाथ म्हणाले, "मी तुमच्यामध्ये अयोध्या धामच्या उत्तर प्रदेशातून आलो आहे. अयोध्या ही प्रभू रामाची जन्मभूमी आहे, त्यांच्या नावाने जम्मूमधील रामगड बांधला आहे." काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले की, काँग्रेसने दीर्घकाळ सत्तेत असूनही अयोध्येचा प्रश्न सुटू दिला नाही. पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी मोदीजींवर विश्वास ठेवला आणि 500 वर्षांची अयोध्येची समस्या जणू काही समस्याच नसल्यासारखी सुटली." योगी पुढे म्हणाले की, काँग्रेसचे नाव हेच समस्या आणि भाजपचे नावच त्यावर उपाय आहे. काँग्रेसवर आरोप करत ते म्हणाले, "आज देशात जिथे जिथे दहशतवाद, नक्षलवाद, अतिरेकी अशा समस्या आहेत, तिथे या सगळ्यांना पोसण्याचे काम काँग्रेसने केले आहे. हिंदूंना कमकुवत करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. केंद्रात काँग्रेस असताना, काँग्रेसनेच या सगळ्यांना खतपाणी घातले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सरकार आणि त्याला पाठिंबा देणारी सरकारे होती, येथे घडलेल्या घटना कोणापासून लपून राहिलेल्या नाहीत.