तभा वृत्तसेवा
मुंबई,
Domestic electricity rate : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यरत होणाèया सौरऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकèयांना दिवसा वीजपुरवठा होणार असून, घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहकांनाही मोठा फायदा होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पांमुळे आगामी पाच वर्षांत 100 युनिटपर्यंत वीजवापर असणाèया घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर 5 रुपये 87 प्रति युनिटपर्यंत, तर 101 ते 300 युनिट वापर असणाèया घरगुती ग्राहकांसाठीचे दर 11.82 रुपये प्रतियुनिटपर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होतील. 1 एप्रिलपासून महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दर कपातीचे लाभ टप्प्याटप्प्याने मिळू लागतील, अशी माहिती महावितरणचे स्वतंत्र संचालक व भाजपा प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी शुक्रवारी दिली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाठक बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सौरऊर्जा निर्मितीच्या धडाकेबाज कार्यक्रमामुळेच शेतकरी, घरगुती व औद्योगिक ग्राहकांचा फायदा होणार असल्याचे पाठक यांनी स्पष्ट केले. या वीज कपातीबाबतचा प्रस्ताव महावितरणने राज्य वीज नियामक आयोगापुढे ठेवला असल्याचेही पाठक यांनी नमूद केले.
पाठक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे राज्यात आगामी दोन वर्षांत 16 हजार मेगावॅट सौर वीजनिर्मिती होणार आहे. त्याचा मोठा फायदा महावितरणला होणार आहे. महावितरणचा सरासरी वीजपुरवठ्याचा दर कमी होणार असल्यामुळे 100 युनिट वापर असणाèया ग्राहकांचे वीजदर 7 रु. 65 पैशांपासून प्रचियुनिट 5.87 रुपयांपर्यंत म्हणजेच 23 टक्क्यांनी कमी होतील, तर 101 ते 300 युनिट वापर करणाèया घरगुती ग्राहकांचे दर सरासरी 13.49 रुपये प्रतियुनिट म्हणजेच 12 टक्क्यांनी कमी होतील, अशी आशाही पाठक यांनी व्यक्त केली. औद्योगिक ग्राहकांसाठीच्या सर्व सवलत, प्रोत्साहन योजना चालू ठेवण्यात येतील तसेच औद्योगिक ग्राहकांना क्रॉस सबसिडी देण्याची गरज पडणार नाही.
पाठक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे अनेक फायदे पुढील पाच वर्षांत ग्राहक आणि महावितरणला होणार आहेत. महावितरणचा सरासरी वीज पुरवठ्याचा दर सध्याच्या 9.45 रुपये या दरावरून 2029-30 पर्यंत 9.14 रुपयांपर्यंत खाली येणार आहे.