बारसू रिफायनरी उभारण्यावर निर्णय नाही

    दिनांक :25-Jan-2025
Total Views |
- केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची माहिती
 
मुंबई, 
कोकणातील बारसू रिफायनरी उभारण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या भागात विचाराधीन असलेल्या वार्षिक ६० मिलियन मेट्रिक टन क्षमतेच्या मोठ्या रिफायनरीऐवजी २० मेट्रिक टन क्षमतेच्या तीन रिफायनरी विविध भागांत उभारण्याचा असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्री Hardeep Singh Puri हरदीपसिंग पुरी यांनी दिली. संबंधित रिफायनरी कुठे सुरू होणार याबाबत त्यांनी स्पष्ट केले नाही.
 
 
Hardeep Singh Puri
 
केंद्र सरकारतर्फे नवी दिल्लीत ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान आयोजित इंडिया एनर्जी वीक अर्थात् आयईडब्ल्यू कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत पुरी बोलत होते. यावेळी बारसू रिफायनरीबाबत ठोस भाष्य करणे टाळले. ते म्हणाले, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने आंध्रप्रदेशमध्ये वार्षिक ९० लाख टन क्षमतेच्या प्रकल्पावर काम सुरू केले आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने याच क्षमतेचे बारमेर, राजस्थान येथे प्रकल्पांवर काम सुरू केले. हे दोन्ही प्रकल्प लवकरच सुरू होतील तसेच सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना वार्षिक १९-२० दशलक्ष मेट्रिक टनापेक्षा अधिक क्षमतेचे प्रकल्प चालविण्याचा नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

रशियाकडून तेल पुरवठा सुरळीत राहणार
अमेरिका आणि रशिया यांच्या संबंधामुळे रशियन तेलावर निर्बंध लादले असूनही भारताचा तेल पुरवठा सुरळीत सुरू आहे. यात व्यत्यय आला तरी तेल मिळविण्याचे मुबलक स्रोत भारताकडे उपलब्ध आहे. सध्या भारताला २९ देशांतून तेलाचा पुरवठा होत आहे. यात अर्जेंटिना या व्या देशाची भर पडली असेल्याचे Hardeep Singh Puri पुरी यांनी नमूद केले.
 
९० कंपन्यांचे सीईओ येणार
आयईडब्ल्यू प्रदर्शनाला ७० हजारपेक्षा जास्त जागतिक प्रतिनिधी भेट देतील. अमेरिका, ब्रिटन, रशिया, जपान, जर्मनी व नेदरलँड्स या आघाडीच्या १० देशांची दालने असतील तसेच या कार्यक्रमात २० हून अधिक परराष्ट्र ऊर्जा मंत्री किंवा उपमंत्री, आंतरराष्ट्रीय संघटनांचे व फॉर्च्यून ५०० ऊर्जा कंपन्यांचे ९० सीईओ सहभागी होतील, असेही Hardeep Singh Puri पुरी यांनी सांगितले.