हवामान विभागाचा इशारा...पुढील चार दिवस राज्यात पावसाचे सावट

22 Oct 2025 16:36:00
मुंबई,
Rain for the next four days दिवाळीच्या शुभ प्रसंगी राज्यभरात पावसाने अचानक हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील हवामान ढगाळ आणि पावसाळू झाले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील चार दिवस राज्यातील हवामान महत्त्वाचे ठरणार आहे.

Rain for the next four days
 
 
या काळात कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे २२ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, नांदेड, यवतमाळ, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच २३ ऑक्टोबर रोजी पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. २४ आणि २५ ऑक्टोबरसाठी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काल मुंबईसह उपनगरातील फोर्ट, भायखळा, लालबाग, दादर, प्रभादेवी, परळ, सायन, कुर्ला, वांद्रे, पवई, अंधेरी आणि मालाडमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस पडला. अचानक पावसामुळे कामावरून घरी जात असलेल्या नागरिकांसह दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात आलेले लोक अडचणीत सापडले. विदर्भातील वर्धा आणि अमरावतीतही मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या वातावरणामुळे नागरिकांची दैनंदिन जीवनात गडबड उडाली असून, पावसाच्या येलो अलर्टमुळे पुढील चार दिवस अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
Powered By Sangraha 9.0