मुंबई,
Cyclone Shakti hits Maharashtra महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली गेली आहे. भारतीय हवामान विभागाने ३ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘शक्ती’ नावाचे ट्रॉपिकल सायक्लोन महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना धोका निर्माण करू शकते, असा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टील जिल्ह्यांवर या चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आंदाजानुसार, ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, तर झंझावाती वारे ६५ किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यास या वाऱ्यांचा वेग आणखी वाढू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याच कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागांत पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर कोकण येथे तीव्र ढगांची निर्मिती होऊन आर्द्रतेचा प्रवेश वाढल्यामुळे पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. सखल भागांमध्ये पूर येण्याचा धोका नाकारला जात नाही. महाराष्ट्र शासनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. Cyclone Shakti hits Maharashtra आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय ठेवण्याचे, किनारपट्टी व सखल भागातील नागरिकांसाठी स्थलांतर योजना तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, समुद्र प्रवास टाळावा आणि मुसळधार पावसात सुरक्षितता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.