मेलबर्न,
Diljit Dosanjh प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांच्या एका कॉन्सर्टमध्ये शुक्रवारी खलिस्तानी समर्थकांनी गोंधळ घातला. AAMI पार्कच्या बाहेर झालेल्या या घटनेनंतर, शहरातील शीख समुदायात संताप पसरला आहे. खलिस्तानी समर्थकांनी शीख फॉर जस्टिस (SFJ) संघटनेचे झेंडे फडकवून घोषणाबाजी केली आणि दिलजीत दोसांझचा कार्यक्रम बंद करण्याची धमकी दिली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

समाजमाध्यमांवर Diljit Dosanjh व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, खलिस्तानी समर्थक लाऊडस्पीकरवरून शिवीगाळ करत आहेत आणि संगीत कार्यक्रमात सहभागी झालेल्या शीख चाहत्यांना देशद्रोही म्हणून संबोधत आहेत. कार्यक्रमाच्या बाहेर फ्लॅश मॉब डान्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, पण या वादामुळे तो कार्यक्रम रद्द करावा लागला.धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना त्वरित हस्तक्षेप करावा लागला. अनेक स्थानिक नागरिक आणि शीख समुदायाचे सदस्य यावर नाराज झाले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, अशा संघटनांवर पूर्वीच कठोर कारवाई केली पाहिजे होती. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांची तैनाती करण्यात आली होती, पण त्याचवेळी काही लोकांनी पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यापूर्वी, SFJ Diljit Dosanjh संघटनेने १ नोव्हेंबर रोजी दिलजीत दोसांझचा कार्यक्रम बंद करण्याची धमकी दिली होती. त्यांचा दावा आहे की, या दिवशी शीख नरसंहाराच्या स्मृतीसंबंधीचा एक महत्त्वाचा दिवस आहे. SFJ ने दिलजीत दोसांझवर आरोप ठेवले आहेत की, त्याने अभिनेता अमिताभ बच्चन यांचा सन्मान करून शीख पीडितांना फसवले आहे.दरम्यान, दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट शांततेत पार पडला. कलाकाराने आपल्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करत त्यांचा मनोरंजन केला. तथापि, कार्यक्रमाच्या बाहेर घडलेल्या या वादामुळे संपूर्ण वातावरण गढून गेले.
दिलजीत दोसांझ हा एक प्रसिध्द पंजाबी गायक-अभिनेता आहे, ज्याने पंजाबी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. 'सरदार जी ३' सारख्या चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर, दिलजीत दोसांझ बॉलिवूडमध्येही सक्रिय आहे आणि सध्या त्याच्या 'बॉर्डर २' आणि 'पंजाब ९५' या हिंदी चित्रपटांची निर्मिती सुरू आहे.या घटनेनंतर, ऑस्ट्रेलियात खलिस्तानी कारवायांबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. काही वेळा अशा प्रकारच्या गोंधळांमुळे द्विपक्षीय संबंध आणि स्थानिक शांतता धोक्यात येते. त्यामुळे, पुढील काळात यावर अधिक चौकशी केली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.