गुवहाटी,
Increased pressure on India दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या टॉप ऑर्डरला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी जोरदार धक्का दिला आहे. गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारताचे फलंदाजीदार दडपणाखाली आले आहेत. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने सुरुवात चांगली केली; पहिल्या धावांमध्ये कोणतीही विकेट न गमावता 9 धावा केल्या, पण चहापानापर्यंत स्कोअर फक्त 4 बाद 102 झाला. भारत अजूनही दक्षिण आफ्रिकेपेक्षा 387 धावांनी मागे आहे.
टीम इंडियाचा स्कोअर एका क्षणी 1 बाद 95 होता, परंतु त्यानंतर केवळ 10 धावांत सलग 4 विकेट पडल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला. 105 धावांवर पाचवी विकेट गमावली गेली; कर्णधार ऋषभ पंत 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. याआधी के. एल. राहुल 22 धावा करून बाद झाला होता, तर यशस्वी जैस्वालने अर्धशतक ठोकले आणि 58 धावांवर आऊट झाला. साई सुदर्शनने 15 धावा केल्या, तर ध्रुव जुरेल शून्यावर परतला.

दक्षिण आफ्रिकेकडून स्पिनर सायमन हार्मरने दोन विकेट घेतल्या, तर केशव महाराज आणि मार्को जान्सेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. सामना या टप्प्यावर फॉलो-ऑन टाळण्यासाठी भारताला अजून 290 धावा कराव्या लागणार आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना सहा बाद 247 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी मुथुस्वामी आणि काइल व्हेरेन यांनी संघाला मजबुती दिली. मुथुस्वामीने 109 तर काइल व्हेरेनने अर्धशतक ठोकले. मार्को यान्सेनने 93 धावा करून संघाचा स्कोअर 489 पर्यंत पोहोचवला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने 151.1 षटके खेळून मोठी धावसंख्या नोंदवली, ज्यामुळे भारतीय संघाच्या गोलंदाजीवर दबाव निर्माण झाला आहे.