... म्हणून सरेतील हल्ल्यांनंतर कॅफेला मिळाली प्रसिद्धी

    दिनांक :28-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Kapil Sharma कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा लवकरच येणाऱ्या चित्रपट ‘किस किस को प्यार करूं 2’ मध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला, जिथे कपिलने केवळ सिनेमाबद्दलच नाही तर कॅनडातील सरे (Surrey) शहरातील त्यांच्या ‘कॅप्स कॅफे’वर घडलेल्या तीन फायरिंग प्रकरणांबाबतही खुलासा केला.
 

Kapil Sharma 
जुलै, ऑगस्ट Kapil Sharma आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत कपिलच्या कॅफेवर झालेल्या हल्ल्यांमुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले, पण कपिलने सांगितले की या घटनांमुळे कॅफेला उलट मोठी ओपनिंग मिळाली आणि स्थानिक लोकांचा पाठिंबा वाढला. ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात बोलताना कपिल म्हणाले, “घटना घडल्या, पण त्यातून फायदाही झाला. नियम आहेत, पण स्थानिक पोलिसांकडे कदाचित पुरेसे अधिकार नव्हते. आमच्या प्रकरणानंतर विषय थेट फेडरल सरकारपर्यंत गेला आणि कॅनडा संसदेतही चर्चा झाली. या घटनेनंतर लोकांनी खूप साथ दिली. देव माझ्यासोबत आहे, त्यामुळे मला काही काळजी नाही.”
कपिलच्या मते, Kapil Sharma या हल्ल्यांमुळे सरे परिसरात कायदा-सुव्यवस्थेच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. तो म्हणाला, “देव जे काही करतो त्यामागचे कारण लगेच कळत नाही. अनेक लोकांनी मला फोन करून सांगितले की सरेमध्ये बऱ्याच समस्या सुरु होत्या. पण माझ्या कॅफेवर फायरिंग झाल्यानंतर ही बातमी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आणि आता परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलली जात आहेत.” कपिलने शेवटी सांगितले, *“मला माझ्या देशात, विशेषतः मुंबईत, कधीही असुरक्षित वाटले नाही.”‘किस किस को प्यार करूं 2’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये कपिल पुन्हा एकदा तीन सुंदर अभिनेत्रींसोबत रोमँस करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुकल्प गोस्वामी यांनी केले असून, यात तृप्ती डिमरी, शनाया कपूर, तरुण गहलोत आणि रवी किशन या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. ट्रेलरमध्ये कपिल प्रेमाच्या शोधात आहे असं दाखवण्यात आलं असून त्यासाठी तो हिंदू धर्मातून इस्लाम धर्मात आणि नंतर इस्लाममधून ख्रिश्चन धर्मात जातो. हलकीफुलकी कॉमेडी, रोमँस आणि गोंधळाचा संगम या चित्रपटातून प्रेक्षक अनुभवू शकतील.कॅनडातील सरे येथील कॅप्स कॅफेवर पहिला हल्ला जुलैमध्ये झाला, दुसरा ऑगस्ट आणि तिसरा ऑक्टोबरमध्ये झाला. कपिलच्या मते, या घटनांमुळे त्यांच्या व्यवसायालाही नवा फायदा झाला आणि स्थानिक समुदायानेही त्यांना मोठा पाठिंबा दिला.कपिल शर्माच्या या खुलास्यानं केवळ त्याच्या चित्रपटाची उत्सुकता वाढवली नाही तर कॅनडातील स्थानिक प्रशासनाची दुर्लक्ष केलेल्या समस्यांकडेही लक्ष वेधलं आहे.