वर्धेत गाईंनाही लावला छपन्न भोग

09 Nov 2025 19:15:45
वर्धा, 
wardha-lunkar-tawari : आपल्या देशात विविध सणांमध्ये भगवान कृष्णाला छप्पन नैवेद्य अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे. ब्रिजवासीयांचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या दैवी शतीने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला. इंद्राच्या क्रोधापासून हजारो प्राणी आणि मानवांचे प्राण वाचवले, अशा प्रकारे मानवतेचा अभिमान भंग झाला. या संरक्षणात्मक कार्याबद्दल कृतज्ञता व्यत करण्यासाठी भत ५६ प्रकारचे पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार करतात आणि ते भगवान श्रीकृष्णाला अर्पण करतात. टावरी कुटुंबाने श्रीकृष्णाला नव्हे तर श्रीकृष्णाच्या सर्वात प्रिय गाईंना ५६ नैवेद्य अर्पण केले. यामध्ये सरकी, ढेप, हिरव्या भाज्या आणि मिठाईंचा समावेश होता. गाय ही भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा असल्याने तिचे पावित्र्य जोपासलेच पाहिजे, असे आवाहन अ‍ॅड. लुणकर टावरी यांनी केले.
 
 
 k
 
या प्रसंगी पं. कुलदीप शुल यांच्या संगीतमय सुंदरकांडाचे पठण करण्यात आले. गोरक्षण येथील गोशाळेतील सर्व गाईंसाठी चारा आणि पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती आणि त्यांची पूजा करण्यात आली. अ‍ॅड. टावरी पुढे म्हणाले की, आपण गाईंशी संबंधित जुनी संस्कृती जपली पाहिजे. गोसेवेसोबतच त्यांनी समाजाला गाईचे दूध, तूप आणि शेण यासारख्या घटकांचे महत्त्व देखील सांगितले. हा प्राणी देशाला स्वावलंबी बनविण्यात देखील मदत करतो.
 
 
गाय कृषीप्रधान भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. वैदिक धर्म आणि भारतीय संस्कृतीच्या चार पायाभूत शिला गाय, गंगा, गीता आणि गायत्री मध्येही गाईला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. गो पालन, गोसेवा, गोरक्षण आणि गोदान हे आपल्या संस्कृतीचे जीवन असल्याचे ते म्हणाले. माहेश्वरी मंडळ वर्धेचे माजी सचिव प्रकाश भुतडा यांनीही गोपालनाचे महत्त्व स्पष्ट केले. महेश्वरी मंडळाचे समन्वयक राजकुमार जाजू यांनी हरीश टावरी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. संचालन डॉ. ईशा टावरी यांनी केले आणि आभार विक्रम टावरी यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0