'या योजनेत' होणार सुधारणा? 2026 पासून बदल

राज्यातील धान्य वाटप पद्धतीत बदल

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Ration Card Rules राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत धान्य वितरणाची पद्धत पुन्हा एकदा सुधारण्यात येणार आहे. पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी 2026 पासून अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तांदूळ आणि गहूच्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत. हा निर्णय राज्यातील कोट्यवधी लाभार्थ्यांच्या मासिक धान्यपुरवठ्यावर थेट परिणाम करणार आहे.
 

Ration Card Rules 
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दरमहा एकूण 35 किलो धान्य देण्यात येणार आहे, ज्यामध्ये 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू यांचा समावेश असेल. तर प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रति सदस्य दरमहा 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू दिले जाणार आहे. पुरवठा विभागाने स्पष्ट केले की, हे वितरण राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातील मूळ तरतुदींच्या अनुरूप केले जाणार आहे.
याआधी काही Ration Card Rules काळासाठी धान्य वितरणाच्या प्रमाणात तात्पुरते बदल करण्यात आले होते. त्या वेळी अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू देण्यात येत होते, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू देण्यात येत होते. ही व्यवस्था राबविल्यानंतर तांदळाचे प्रमाण वाढले असले तरी गव्हाचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक भागांत लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त झाली होती. काही ठिकाणी तांदळाची जास्त मागणी असल्यामुळे काही प्रमाणात समाधान दिसले, पण गहू कमी मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांच्या दैनंदिन गरजांवर प्रतिकूल परिणाम झाला होता.
 
 
सरकारने या सर्व Ration Card Rules  बाबींचा विचार करून मूळ वितरण पद्धतीकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. पुरवठा विभागानुसार, डिसेंबर 2025 पर्यंत सध्या सुरू असलेले धान्य वाटपाचे प्रमाण कायम राहणार असून त्या महिन्यात लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्यात कोणताही बदल होणार नाही. मात्र, जानेवारी 2026 पासून नव्याने निश्चित केलेले प्रमाण संपूर्ण राज्यात लागू केले जाईल.याप्रसंगी प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या कार्डावरील सदस्यसंख्या तसेच मासिक मिळणाऱ्या धान्याची माहिती वेळोवेळी पडताळणी करावी. गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे, धान्य वाटपातील हा बदल त्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणार आहे. नव्या व्यवस्थेमुळे तांदूळ आणि गहू यातील संतुलन पुन्हा प्रस्थापित होणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.