मुंबई,
Devendra Fadnavis आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे युतीची बुधवारी घोषणा झाल्यानंतर, विरोधी पक्ष नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने फार काही घडेल, असा समज बाळबोध आहे. “ठाकरे यांनी सातत्याने मराठी माणसाचा विश्वासघात केला. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड फक्त भ्रष्टाचार आणि स्वहिताचा राहिला आहे. त्यामुळे यंदा मुंबईची जनता त्यांच्या भावनिक आवाहनाला भुलणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.
शिवसेना-मनसे युतीबाबत टीका करताना फडणवीसांनी प्रसारमाध्यमांवरून उदाहरण दिले. त्यांनी सांगितले, “मी सहज टीव्ही बघत होतो. त्यावेळी काही माध्यमं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा कार्यक्रम दाखवत होती, जणूकाही रशिया-युक्रेनची युती झाली आहे. इकडून झेलेन्स्की निघाले, तिकडून पुतीन निघाले आणि ही युती झाली. कुठल्याही पक्षाला निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करावे लागते, तेच या दोन्ही पक्षांनी केले आहे. यापलीकडे याचा फारसा अर्थ लावण्याची गरज नाही. त्यामुळे फारकाही परिणाम होईल असे वाटत नाही.”

फडणवीसांनी शिवसेना-मनसे Devendra Fadnavis युतीचा मुद्दा फक्त निवडणुकांच्या दृष्टीने पाहिला, असे स्पष्ट केले. “ज्याप्रकारे या मंडळींनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे, मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवायचे काम केले आणि पाप केले आहे, त्यामुळे मराठी माणूस यांच्यासोबत नाही. मुंबईत यांच्यासोबत यायला कोणीही तयार नाही. निवडणुका जवळ आल्या की भावनिक बोलायचे, पण जनता आता या भावनिक बोलण्याला भुलणार नाही. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीसाठी आणखी दोन-चार जण सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीचे काम बघून मतदान करतील,” असे फडणवीस म्हणाले.त्यांच्या या टीकेनंतर आता ठाकरे बंधू काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत या युतीचा वास्तवात काय परिणाम होतो, याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे.