मुंबई,
rashtriya-samaj-party-and-congress महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे. नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही काँग्रेस समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भूमिका बजावणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले की, आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) एकत्र लढणार आहेत.

टिळक भवन येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आघाडीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत आघाडीची औपचारिक घोषणा केली. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महादेव जानकर हे बहुजन समाजाचा विश्वासार्ह आवाज आहेत आणि देशात लोकशाही व संविधान पायमल करण्याचे काम भाजप करत असताना, समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत आघाडीची औपचारिक घोषणा केलेली नव्हती, परंतु सातारा, सांगली तसेच मराठवाडा आणि विदर्भात काँग्रेस आणि रासपने एकत्र लढले असून, हीच भूमिका आगामी काळातही पुढे नेली जाईल. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार घेऊन काम करताना समविचारी पक्षांनी एकत्र असावे, या भावनेतून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. rashtriya-samaj-party-and-congress काँग्रेसबरोबर रासपची आघाडी ३१ मे रोजी निश्चित झाली. राहुल गांधी देशातील तरुण, महिला, आदिवासी, गोरगरीब आणि मागासवर्गीयांचा आवाज बनून काम करत आहेत. जागा किती मिळणार यापेक्षा संविधान व लोकशाहीचे रक्षण करण्याची आणि सामान्य लोकांना मान-सन्मान मिळण्याची गरज अधिक महत्त्वाची आहे, असे जानकर यांनी सांगितले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत विचारले असता हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत; आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढली होती, परंतु मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात, अशी पक्ष कार्यकर्त्यांची भावना असल्यामुळे निर्णय घेतला गेला आहे. प्रभारी रमेश चेन्नीथल यांनीही पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश मोठे असून, महायुतीने साम, दाम, दंड, भेद यांची खुलेआम वापर केली तरीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्धार आणि निष्ठेने लढले. अनेक ठिकाणी स्वबळावर लढल्याचा फायदा काँग्रेसला मिळाला. rashtriya-samaj-party-and-congress नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ४१ नगराध्यक्ष निवडून आले, ज्याबद्दल प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ४१ आकड्याच्या आकाराचा पुष्पगुच्छ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भेट दिला.