वीज यंत्रणेजवळ कचरा जाळू नका; महावितरणाचे नागरिकांना आवाहन

17 Mar 2025 17:32:26
नागपूर,
Mahavitaran उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ झाल्यामुळे विजेच्या उपकरणांजवळ कचरा जाळल्यास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन महावितरणने केले आहे. वीज वाहिन्या, वितरण रोहित्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे वीज यंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीज वितरण कंपनीला नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
 
Mahavitaran
 
शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पिलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी किंवा डी.पी. अशा वीज यंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीज यंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधित परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. Mahavitaran दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने कचऱ्यास आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत.
 
वीज यंत्रणा उन्हामुळे तापलेली असल्याने अशातच अशा आगीमुळे वीज वितरण यंत्रणेचे तापमान वाढल्यास यंत्रणेला त्याचा फटका बसतो. उपरी वीजवाहिन्याखाली असलेल्या कचऱ्याचा ढिग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे. Mahavitaran नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीज यंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीज यंत्रणेला आग लागल्यास 1912 किंवा 19120, 1800-212-3435 आणि 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला त्याची सूचना देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
आग लागायच्या घटनांमध्ये वाढ
मागिल काही दिवसांत नागपूर शहरासह मौदा तालुक्यातील पावडदौना, बाभुळगाव तालुक्यातील गळवा, आर्वी येतेह आग लागण्याच्या घटना झाल्या आहेत, Mahavitaran वाढत्या तापमानासोबतच कचरा टाकल्याने अथवा जाळल्यामुळे देखील अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
शॉर्ट सर्किटचा धोका
घरगुती विद्युत उपकरणे आणि दिवे अति गरम झाल्याने शॉर्ट सर्किटचा धोका होऊन आग लागण्याचीही शक्यता असते. घरगुती वायरिंग किंवा नादुरुस्त स्विचेस आणि उपकरणांमुळेही शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिकल आउटलेट्स किंवा एक्स्टेंशन कॉर्ड ओव्हरलोड झाल्यास याशिवाय वायरिंगमध्ये कित्येक वेळी सैल जोड वा कनेक्शन असतात, कालांतराने हे जोड कार्बनाइज होतात. Mahavitaran कधी कधी हे जोड सैल असल्यामुळे व त्याला घट्ट इन्सुलेशन न केल्यामुळे उंदीर, पाल आदी या वायर कुरतडतात व हळूहळू त्यामुळे स्पार्किंग सुरू होते व प्रसंगी शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असते.
 
अशा वेळी प्रथम घरातील मेन स्विच बंद करावा व मगच पाणी न वापरता कार्बन डायऑक्साइड, कोरडी रेती यांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करावा. त्यापूर्वी याची सूचना अग्निशमन विभागाला देण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे. Mahavitaran नॅशनल इलेक्ट्रिक कोड प्रमाणे वायरिंगचे आयुष्य 20 ते 25 वर्षे असावे असे निर्देश आहेत. घरगुती वायरिंगला 20 वर्षे झाल्यावर ग्राहकाने एखाद्या मान्यताप्राप्त किंवा महाराष्ट्र शासनाचा अनुज्ञप्तीधारक विद्युत कंत्राटदाराकडून आवश्यक त्या चाचण्या करून घेत त्याच्या सूचनेनुसार वायरिंग बदलून घेण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
 
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
Powered By Sangraha 9.0