छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करा

03 Apr 2025 15:53:22
नागपूर,
Chhatrapati Shivaji Maharaj भारताच्या सतत पराजयाचे जे युग चालू होते, ते युग छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बदलले. ते युग बदलेल, विजयाच्या दिशेने चालेल, विजयाच्या दिशेने वाटचाल खुप लांबची आहे, ही सतत चालू राहील, यासाठी काय करावे, ते सगळं शिवाजी महाराजांनी केले. त्यामुळे त्यांचे सर्व गुण प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
 

छत्रपती शिवाजी महाराज  
 
शिवचरित्र अभ्यासक व व्याख्याते दिवंगत सुमंत टेकाडे लिखित व डॉ. श्याम धोंड संपादित ‌‘नियोजन आणि व्यवस्थापनाचे दीपस्तंभ युगंधर शिवराय‌’ ग्रंथाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले. माधवी टेकाडे, डॉ. श्याम झोंड. श्रीमंत राजे मुधोजी भोसले, सचिन उपाध्याय व दत्ता शिर्के व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. मोहनजी भागवत आपल्या उद22बोधनात म्हणाले की, शिवाजी महाराज युगंधर, युगप्रवर्तक आहेत. सिकंदराच्या काळापासून सुरू झालेली आक्रमणाची परंपरा, त्यातील ताजे इस्लामच्या नावाखाली येणारे आक्रमण सर्व उद22ध्वस्त करून टाकणारे, सगळं बदलून टाकणारे आहे. त्यावर उपाय सापडत नव्हता, अनेक प्रयोग झाले. अनेक लोकांनी निरनिराळ्या प्रकारे संघर्ष केले. तो उपाय शिवाजी महाराजांनी दिला. शिवाजी महाराज आग्राहून परत सुखरूप येतील की नाही, याची वाट भारत व जग पहात होते. ते सुखरूप परत आले, गेलेलं सगळं परत मिळवले, आणि राजे झाले. त्याबरोबर सगळ्या परकीयांची सत्ता भारतात संपुष्टात आली. त्यांच्या राज्याभिषेकाबरोबर परकियांची सद्दी संपली. त्यावेळी शिवाजी महाराजांची जी प्रेरणा होती, ती प्रेरणा आजतागायत, सतत, तशीच, तेवढ्याच प्रखरतेने विद्यमान आहे. डॉ. हेेडगेवार, गुरुजी आणि बाळासाहेबांनीही वेगवेगळ्या वेळी म्हटले आहे की, आपले संघाचे काम तत्त्वरूप आहे, व्येिवादी नाही. पण, अशी निर्गुण उपासना कठीण असते. म्हणून जर आपल्याला साकार आदर्श हवाच असेल तर तो पौराणिक काळातील श्रीहनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. आजही तोच आदर्श आहे. शिवाजी महाराजांच्या लढायांमागे नियोजन होते, व्यवस्थितता होती. आपले राज्य, प्रशासन कसे चालवले, कितीतकी नवीन गोष्टी, त्या काळात इतके पुढे जाऊन विचार करणे, त्या कल्पना, सगळ्या समाजामध्ये न्याय प्रस्थापित करणाऱ्या, समता प्रस्थापित करणाऱ्या आजही आपण पूर्णपणे लागू केलेल्या नाहीत. पण, त्या वेळेला त्यांनी त्या कल्पनेत आणल्या आणि राबवून दाखवल्या. अशी कितीतरी कल्पना आहेत. जुने व आधुनिक शास्त्रे यांचा मेळ घालून त्याची माणसे प्रशिक्षित करून आरमार उभे केले. प्रत्येक बाबतीत देश स्वनिर्भर व्हावा,
हे त्यांनी केले. युगपुरुषांनी घालून दिलेले धडे, त्यांनी चालून मळवलेली वाट ही सदासर्वदा चालण्यायो12य असते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची महती सगळीकडे पोहोचली पाहिजे.Chhatrapati Shivaji Maharaj ते ज्या कळकळीने सुमंतने केले, ज्या प्रामाणिकतेने केले, शब्दांना त्यातून सामर्थ्य येते. सुमंत हे जीवित कार्य मानले व संपन्न केले, असे डॉ. मोहनजी म्हणाले. प्रारंभी सुमंत टेकाडे यांच्यावरील चित्रफित दाखवण्यात आली. डॉ. मोहनजी भागवत व इतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले. राजे मुधोजी भोसले यांनी सुमंत टेकाडे यांची आठवण सांगून त्यांचे जाणे हे नागपूरची क्षती असल्याचे सांगितले. डॉ. श्याम धोंड यांनी या पुस्तकाचा लेखन प्रवास कथन केला. संत तुकारामांच्या अभंगातील एक श्लोक उद22धृत करून सुमंतच्या लेखांना कुठेही ध ा न लावता केवळ संपादन केल्याचे सांगितले. मालती ढोलेयांनी दिवंगत सुमंत टेकाडे यांच्या आठवणी सांगितल्या. दत्ता टेकाडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अतुल गुरू यांनी किल्ले शिवनेरी तसेच शिवकालीन मंदिरे, समाध्या यांची प्रतिकृती साकारली होती. राष्ट सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, रा.स्व. संघाचे अ.भा. कुटुंब प्रबोधन प्रमुख रवींद्र जोशी, विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सहसंघचालक श्रीधर गाडगे, संपर्क प्रमुख अरविंद कुकडे, तसेच पद22मश्री डॉ. विलास डांगरे, अनिल दांडेकर, डॉ. दिलीप गुप्ता आदींसह टेकाडे परिवार तसेच अनेक नागरिक उपस्थित होते. ब्लाइरड रिलीफ असोसिएशनचे सभागृह आणि खाली अंगणात भरगच्च उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0