पलगाव सीएडीत उभारली शहीद जवान भींत
वर्धा,
Dr. Ramdas Ambatkar साधा सरळ, राजकारणात असुनही फारसा त्याचा स्पर्श न झालेले... संघ संस्कारातून आपुलकी, विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणजे मी अशी भावना असलेले, सतत प्रवासात राहत असलेले विधान परिषदेचे माजी सदस्य आ. डॉ. रामदास आंबटकर यांनी शक्ती स्मारकाची उभारणी केली. दुसर्या महायुद्धातील रणगाडा आणण्यासाठी त्यांनी कसोटी लावली. शासकीय आणि राजकीय अडचणीत पुर्ण झालेल्या शक्ती स्मारकाचे लोकार्पण होऊ शकले नाही. १५ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शक्ती स्मारकाचे लोकार्पण नियोजित आहे. शक्ती स्मारकाची कोनशीला तयार झाली. परंतु, त्या कोनशीलेवर आता स्व. रामदास आंबटकर असे कोरावे लागणार आहे.
हिंगणघाट तालुयातीड वडनेर सारख्या छोट्या गावात जन्मलेले रामदास आंबटकर यांचे वडील स्व. भगवानजी भारतीय जनता पार्टीचे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टीचे काम केल्यानंतर त्यांना वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांसाठी (स्थानिक स्वराज्य संस्था) विधान परिषदेची तिकीट दिली. ते विजयी झाले. वर्धा जिल्ह्याविषयी त्यांना प्रचंड आत्मियता होती. Dr. Ramdas Ambatkar त्यांनी वर्धा शहरात जिल्हाधिकारी बंगल्याच्या बाजूला सैनिकांचे स्मरण म्हणून शक्ती स्मारकाची संकल्पना मांडली. त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधीही दिला. या शक्ती स्मारकात भारतातील तीनही युद्धातील जवानांची वीरता दर्शवनारी वॉल उभारली, दुसर्या महायुद्धातील विजयी रणगाडा आणला. हा रणगाडा आणण्यासाठी आंबटकर यांना प्रचंड परिश्रम घ्यावे लागले.
याच शक्ती स्मारकात वर्धेतील रहिवासी शहीदांची नावंही कोरण्यात आली आहे. २०२४ मध्ये त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी शक्ती स्मारकाचे लोकार्पण होणे अपेक्षित होते. परंतु, शासकीय व राजकीय अडचणींनी त्या स्मारकाचे लोकार्पण होऊ शकले नाही. दरम्यान, त्यांची प्रकृर्ती बिघडली. १५ मे रोजी वर्धेत होऊ घातलेल्या देवाभाऊ कुस्ती स्पर्धेच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने त्याचवेळी शक्ती स्मारकाचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. आता शक्ती स्मारकाचे लोकार्पण कधीही झाले तरी त्या सोहळ्याला माजी आमदार रामदास आंबटकर नसतील. Dr. Ramdas Ambatkar माजी आ. रामदास आंबटकर यांच्या निधीतून वर्धेतील बजाज चौकात युवकांसाठी प्रेरणा देणारे युवा स्मारकतील पुतळेही तयार झाले आहेत. त्याचेही लोकार्पण लगेच होणार होते. तर पुलगाव येथील सीएडी कॅम्पमध्ये शहीद जवानांच्या स्मरणात त्यांनी भींत उभी केली होती. जिल्ह्यातील अनेक शाळांना त्यांनी संगणक भेट दिले होते, हे उल्लेखनिय!