वर्धा,
stops child marriage हिंगणघाट शहरात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह लग्नाच्या दिवशी थांबविण्यात बाल संरक्षण पथकाला यश आले आहे. हा बालविवाह १५ मे रोजी होणार होता. हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात १५ मे रोजी बालविवाह होणार असल्याची माहिती बाल संरक्षण पथकाला मिळाली. इतकेच नव्हे तर मुलगी अल्पवयीन असल्याची इत्यंभूत माहिती मिळाल्याने बाल संरक्षण पथक थेट लग्न मंडपात पोहोचले.
या पथकातील अधिकार्यांनी पूर्वी हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली होती. माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनीही लग्न मंडप गाठला. बाल संरक्षण समिती व पोलिसांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून हा बालविवाह थांबविण्यात यश आले. यावेळी वर व वधू पक्षाला अधिकार्यांनी समुपदेशन केले. तसेच बालविवाह हा कायद्यान्वये गुन्हा असल्याचे पटवून दिले.