५३ हजार कुटुंबाचा सर्व्हे पूर्ण

बेघर,कच्चा घरातील कुटुंबांना दिलासा

    दिनांक :16-May-2025
Total Views |
पीएम आवास; घरकुल सर्व्हेला ३१ मे पर्यंत मुदतवाढ
 
अकोला,
Pradhan Mantri Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत बेघर आणि कच्च्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात अशा कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.१४ मे पर्यंत ५३ हजार ५०६ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून ३१ मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
 
Pradhan Mantri Awas Yojana
 
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ग्रामीणअंतर्गत बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून करण्यात येत आहे. ग्रामसेवकांमार्फत व संबंधित कुटुंबप्रमुखांकडून 'महाआवास अॅप'द्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. Pradhan Mantri Awas Yojana सर्वेक्षण करण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत होती. ती १५ मे पर्यंत वाढविण्यात आली मात्र तीन दिवसांपासून तांत्रिक समस्येमुळे नोंदणी होवू शकली नाही.त्यामुळे केंद्र शासनाने पुन्हा ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. स्वतः अँपद्वारे व यंत्रणेमार्फत हा सर्व्हे सुरू आहे. 'महाआवास अॅप'वर कुटुंबातील सदस्यांची नावे, आधार कार्ड क्रमांक, रोहयो जॉबकार्ड क्रमांक, कच्चे घर असल्याचे छायाचित्र, बेघर कुटुंबप्रमुखाने घरकुल बांधकामाच्या जागेचे छायाचित्र आदी माहिती अपलोड करणे आवश्यक आहे.
आतापर्यंत झालेले सर्व्हेक्षण
अकोला ९२११
अकोट ७८९२
बाळापूर ६४२०
बार्शीटाकळी ६८६९
मूर्तिजापूर ४८०५
पातूर ६३७५
तेल्हारा ८४३४
एकूण ५३५०६
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कच्चे घर व बेघर असणाऱ्या कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू असून या योजनेला केंद्र शासनाकडून ३१ मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
मनोज जाधव, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प अकोला