मुंबई,
Jiah Khan बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून अभिनेता सूरज पांचोली याने याविषयी उघडपणे भूमिका मांडली आहे. जियाच्या आत्महत्येनंतर सूरज पांचोलीवर तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यावेळी तो जियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. जवळपास एक दशक या प्रकरणात मीडिया ट्रायलला सामोरे गेल्यानंतर आता सूरजने त्याचा आवाज उठवला आहे.
भावना व्यक्त सुरज करताना “माझ्या अयशस्वी नात्यामुळे मला दहशतवाद्यासारखे वागवले गेले. मी फक्त २० वर्षांचा होतो आणि मीडियाने मला खलनायक ठरवले.”त्याने असेही स्पष्ट केले की, “या प्रकरणात कोणीही कधीही दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त आरोपच झाले. कोणीही विचारले नाही की मी काय भोगत होतो.” सूरज पुढे म्हणतो, “या खटल्याच्या संपूर्ण प्रक्रियेतून जाणे हीच माझ्या नावावरील डाग पुसण्याची एकमेव संधी होती. मला याची मोठी किंमत मोजावी लागली.”त्याने सांगितले की, “मी दर आठवड्याला दोन वेळा कोर्टात जायचो, तर कधी सलग सहा दिवसही कोर्टात उपस्थित राहायचो.” जिया खानच्या Jiah Khan घरी सापडलेल्या पत्रांच्या आधारे त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर न्यायालयाने या पत्रांना बनावट ठरवले. “जर ते पत्र खोटे होते, तर मग सुरुवातीला मला अटक का केली गेली?”, असा सवालही त्याने उपस्थित केला.
बोलण्याची ही योग्य वेळ
सूरज Jiah Khan पांचोली म्हणतो की, “लोक आता माझं ऐकण्यास तयार आहेत, म्हणूनच आता बोलण्याची ही योग्य वेळ आहे. अजूनही मला धक्का बसतो की कुणी मला फसवलं असेल का?” त्याने यामागे वडील आदित्य पंचोली यांच्याशी वैर असलेल्या व्यक्तींचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली, मात्र कोणाचेही नाव घेतले नाही.दरम्यान, सूरज पांचोली आता आपल्या पुनरागमनाबद्दल चर्चेत आहे. ‘केसरी वीर’ या चित्रपटात तो झळकणार असून त्याच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.