वर्धा,
Mahavitaran मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध दहा विविध विषयांवर १०० दिवसांचा राज्यस्तरीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम घोषित केला होता. शनिवारी यात महसूल विभागनिहाय कोणती कार्यालये सरस ठरली, त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये नागपूर विभागातून महावितरणच्या आर्वी उपविभागाने प्रथम क्रमांक पटकाविला. मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम सुरू केला होता. हा उपक्रम राज्यातील सर्व ३५८ तालुयातील १० हजार शासकीय कार्यालयांमध्ये राबविण्यात आला. सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसुली विभागातील उत्कृष्ट तीन तालुका कार्यालयांची शनिवारी घोषणा करण्यात आली.

या स्पर्धेसाठी वेबसाइट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर आदी निकष होते. गेले १०० दिवस तालुकास्तरीय कार्यालयांनी या निकषांवर किती काम केले, त्यावरून निकाल घोषित करण्यात आला आहे. Mahavitaran यात महावितरणच्या बहुतांश उपविभागांनी साजेशी कामगिरी करीत या स्पर्धेत सर्वच निकषांवर आघाडी घेतल्याने आता ही कार्यालये आणि तेथील अधिकार्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे.
महावितरणचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, गोंदीया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे, Mahavitaran अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक आणि अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी या नेत्रदीपक कामगिरी बद्दल शुभेच्छा दिल्या.