वादळीवार्‍यासह अवकाळी पाऊस शेतातून पाणी वाहल्याने बांध फुटले

18 May 2025 21:43:56
साखरखेर्डा,
The dam broke गेल्या तीन मे पासून सिंदखेडराजा तालुक्यात वादळीवार्‍यासह अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. अनेक शेतकर्‍यांनी उन्हाळ्यात शेतात बांध टाकले असता या अवकाळी मुसळधार पावसाने बांध फुटले आहे. आजही दुसरबीड, किनगाव राजा, जांभोरा, जऊळका, चांगेफळ या भागात विजेच्या गडगडाटासह दुपारी पावसाला सुरुवात झाली. तब्बल एक तास पावसाने हजेरी लावली. वीजेच्या कडकडाटाने थैमान घातले असता जनमानसात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. १३ मे नंतर अधून मधून पावसाची रिपरिप सुरूच होती.
 
 
The dam broke
 
त्यामुळे शेतातील धुर्‍यावर टाकलेले मातीचे बांध १३ मे रोजीच्या पावसाने फुटले होते. परंतू अधूनमधून पावसाने हजेरी लावल्याने दुरुस्ती कामाला विलंब लागत असे. आज काही शेतकर्‍यांनी शेतात जाऊन बांध दुरुस्ती सुरु केली, बांधावर असताना पुन्हा आकाशात आभाळ दाटून आले. The dam broke सुसाट वेगाने वारा सुटला आणि वीजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. नागाटी केलेल्या शेतातून पाणी वाहू लागले. नाले, ओढे खळाखळा वाहू लागली. हवामान तंज्ञ पंजाबराव डंख यांनी १५ मे रोजी सोशल मीडियावर व्हीडिओ टाकून ३० मे पर्यंत पाऊस असल्याचे सांगितले.
 
त्यामुळे मे महिन्यात उन्हाळा एवजी पावसाळा अनुभवायला मिळत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत प्रचंड उकाडा जाणवत असताना दोन नंतर ठरलेल्या वेळेप्रमाणे पावसाचे आगमन होते. या अवकाळी पावसाने शेतीची मशागतीची कामे करणे सोपे झाले आहे. नागाटीची ढेकळे विरघळली आहे. The dam broke ओलही दोन फुटांपर्यंत गेली आहे. जांभोरा, जऊळका, चांगेफळ, वर्दडी बु ., रुम्हणा, आडगावराजा, किनगावराजा, दुसरबीड या भागातील शेतकर्‍यांनी सरकी टोचणीला सुरुवात केली आहे. या भागातील शेतकरी दरवर्षी मे महिन्यात १५ नंतर सरकी लावतो, यावर्षी मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने त्यांचे काम सुरळीत झाले आहे .
 
Powered By Sangraha 9.0