सैनिकहो तुमच्यासाठी, वर्धेत तिरंगा यात्रा

    दिनांक :18-May-2025
Total Views |
वर्धा,
Tricolor Yatra in Wardha शेजारी शत्रू पाकिस्तानने भारतीय पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि युद्ध सुरू झाले. भारतीय सैनिकांनी चोख प्रतिउत्तर दिले. त्या सैनिकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत ही हिम्मत देत तुमच्यामुळे आम्ही सुखाने झोपू शकतो असा भाव व्यक्त करीत वर्धेकर हातात झेंडा घेऊन रस्त्यावर आले. साई बाबा मंदिर येथून निघालेल्या तिरंगा रॅलीत हातात झेंडा घेऊन हजारो वर्धेकर सहभागी झाले होते.
 
 
Tricolor Yatra in Wardha
 
शूर सैनिकांना नमन करण्यासाठी व ऑपरेशन सिंदूरच्या विजयाचा गौरव करण्यासाठी आज रविवार १८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली. Tricolor Yatra in Wardha या तिरंगा यात्रेत सर्वात पुढे वर्धेतील माजी सैनिक, त्यानंतर दिव्याग बंधू दुचाकी, विद्यार्थी परिषदेच्या झाकी आणि महिला-पुरुष सहभाग होते. ७५ फुटांचा तिरंगा विशेष आकर्षण होते.
 
 
पाकिस्तान सदैव आतंकवाद्यांना प्रोत्साहन देत भारतावर आतंकवादी हल्ले करतो. पहलगाम मधील आतंकवादी हल्ल्यांमध्ये धर्म विचारून २७ निरपराध पर्यटकांची पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी निर्घृण हत्या केली. यामुळे संपूर्ण देश आक्रोशीत. देश भावना लक्षात घेता भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवायचे ठरवून आतंकवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर हल्ले चढवीत शेकडोच्यावर आतंकवाद्यांना यमसदनी धाडले. Tricolor Yatra in Wardha त्यानंतरही शत्रू राष्ट्रानी आगळीक करीत भारतावर अयशस्वी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिउत्तर देत भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचे एअरबेस मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केले. त्याचा परिपाक म्हणजे शेवटी पाकिस्तानला नमते घेत सिझफायर करावा लागला.
 
 
सैन्यांनी केलेल्या या भीम पराक्रमाचा गौरव करण्यासाठी साई मंदिर येथून तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली. निर्मल बेकरी, सोशालिस्ट चौक, इंगोले चौक मार्गे फिरत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप झाला. नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खा. रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, निलेश किटे, निलेश पोहेकर, गिरीश गांधी, अनिल कावळे, संजय बडगीलवर, माजी सैनिक श्याम परसोडकर, Tricolor Yatra in Wardha चित्रा ठाकूर, शीतल डोंगरे, श्याम देशपांडे, रोहिणी व राजेंद्र डोळे, गुंडू कावळे, वीरू पांडे, वरूण पाठक, मिलिंद भेंडे, प्रदीप ठाकूर, अशोक कलोडे, सतीश बावसे, अटल पांडे, रामू लष्कर, संजीव लाभे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, अनघा आगवन, श्रेया देशमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन श्रीधर देशमुख यांनी केले.