नाशिक,
Nasik-Jindal-Fire जिंदाल कंपनीत 3 दिवसांपूर्वी आग लागली असून आजपर्यंत त्या आगीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. आतापर्यंत अग्निशमन दलाचे 30 ते 40 बंब आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी, कंपनीच्या परिसरातून दाट धुराचे काळे लोट निघत आहेत. आग विझविण्यासाठी पाणी अपुरे पडत असून, इतर ठिकाणांवरून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Nasik-Jindal-Fire जिंदाल कंपनी पॉलिफिल्म्स बनविण्याचे काम करते. त्यासाठी आवश्यक अच्चा माल आणि रसायने भरपूर प्रमाणात कंपनीच्या परिसरात असल्याने आग अनियंत्रित झाली आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर असलेल्या जिंदाल कंपनीतील आगीने आता रौद्रावतार धारण केला आहे. ही आग विझविण्यासाठी नाशिकसह (Thane) ठाणे, (Mumbai) मुंबई आणि (Malegaon) मालेगाव महापालिकांसह काही नगरपालिकांकडूनही पाणी मागविण्यात येत आहे.
Nasik-Jindal-Fire जिंदाल कंपनीतील आगीवर अजून नियंत्रण मिळविता आलेले नसून, हा पूर्ण प्लान्ट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. पाण्यासोबतच अग्निशामक फोमचा मारा करून, आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कंपनीच्या प्रांगणात असलेली एलपीजीची टाकी (LPG Tank) ही धोक्याची बाब आहे. या टाकीचे तापमान वाढले तर मोठा स्फोट होऊ शकतो. तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत पाणी आणि फोमचा मारा करून टाकीचे तापमान नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
Nasik-Jindal-Fire या आगीत 2 कामगार जखमी झाले असून, अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. या कंपनीत आग लागण्याची ही दुसरी वेळ असून, आता ती नियंत्रणाबाहेर गेली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता (NDRF) एनडीआरएफ अर्थात आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांची मदत घेतली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश आल्यामुळे आगीमागे नेमकी कोणती कारणं आहेत, यावर चर्चा सुरू झाली आहे.