रामटेक,
Umed Abhiyan राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्लमून करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोंनती अभियानाची सुरुवात २०११ मध्ये केली. महाराष्ट्र राज्यात या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोंनती अभियान 'उमेद' या स्वतंत्र संस्थेची स्थापन करण्यात आली. या अभियानाची अंमलबजावणी राज्यातील ३४ जिल्हे व ३५१ तालुक्यात पूर्ण ताकदीने होत आहे. या अभियानाचा माध्यमातून स्वयंसहायता बचत गटाद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योजकतेला चालना दिली जात आहे. उमेद अभियानांतर्गत ग्रामीण भागात राहत असलेल्या गरजू महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करता यावा. स्वतःचा उद्योग सुरू करून पुरूषांच्या बरोबरीने प्रगती करता यावी. उमेदच्या माध्यमातून महिलांना बचत करण्याची सवय लागली असून त्यांच्यात स्वयंरोजगारासह बँकेचे व्यवहार करण्याची क्षमता विकसित झाली आहे. अनेक महिला बँकेमार्फत कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय करत आहेत.
रामटेक तालुक्यातील नगरधन येथे “उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान” अंतर्गत आदर्श वृंदावन प्रभागसंघाच्या, मैत्री उत्पादक गटाच्या महिलांनी गावातच सुपारीचा उद्योग सुरु केला. या उद्योगातून होणाऱ्या नफ्यातून त्यांचे जीवनमान उंचावत चालले आहे. उमेदच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास आणि संघटनशक्ती निश्चितच कौतुकास्पद आहे.Umed Abhiyan उमेद अभियाना अंतर्गत महिलांची गावातच व्यवसाय करुन प्रेरणादायी प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे.उमेदअभियानामुळे आमची आर्थिक परिस्थिती बळकट झाली.अशा प्रतिक्रिया महिलांकडून आलेल्या आहे."उमेद" मुळे आम्हाला हा व्यवसाय सुरू करता आला. या उद्योगाला सरपंच माया अरुण दमाहे यांनी जागा उपलब्ध करुन दिली. या उद्योगामुळे आमची आर्थिक परिस्थिती हळूहळू बळकट होत आहे. हा उद्योग सुरु करण्याकरिता तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष, पं.स. रामटेक व आमच्या सी.आर.पी. सीमा बिरनवार यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले .
सौजन्य: सारंग पांडे,संपर्क मित्र (रामटेक )