नवी दिल्ली,
Abhishek Singh भारतासाठी अभिमानास्पद ठरलेली एक ऐतिहासिक घटना नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये घडली. देशातील पहिले आयएएस अधिकारी म्हणून अभिषेक सिंग यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर चालण्याचा मान मिळवला. यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पहिल्यावहिल्या चित्रपट ‘१९४६ : डायरेक्ट अॅक्शन डे – द इरेस्ड हिस्ट्री ऑफ बंगाल’ याचे जागतिक प्रीमियर याच मंचावर झाले. हा चित्रपट पाहून जगभरातील प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले.
भारताच्या फाळणीपूर्व काळातील बंगालमधील सांप्रदायिक आणि राजकीय तणावावर आधारित ही कथा विस्मरणात गेलेल्या इतिहासाचे वास्तव दाखवते. १९४६ मधील डायरेक्ट अॅक्शन डे या घटनेवर फारशा चर्चा झाल्या नसल्या, तरी या चित्रपटामुळे त्या काळातील पार्श्वभूमी नव्या पिढीसमोर समोर आली आहे. हा चित्रपट केवळ ऐतिहासिक नाही, तर सध्याच्या ओळख, नागरिकत्व आणि देशभक्ती यांसारख्या मुद्द्यांवरही विचार करायला लावतो.
कान्समध्ये Abhishek Singh आपल्या भावना व्यक्त करताना अभिषेक सिंग म्हणाले, "कान्सच्या रेड कार्पेटवर चालणे हे अनेकांचे स्वप्न असते. मी केवळ अभिनेता किंवा चित्रपट निर्माता म्हणून नव्हे, तर प्रशासनात राहून देशसेवा केलेल्या व्यक्तीच्या भूमिकेतून भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. नोकरशाही ते चित्रपट सृष्टी असा माझा प्रवास नेहमीच अर्थपूर्ण कथा सांगण्यासाठीच राहिला आहे."एक काळचा यशस्वी आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे अभिषेक सिंग यांनी आपल्या निर्णयक्षमतेमुळे आणि नव्या सार्वजनिक योजना राबवण्याच्या कामामुळे नाव कमावले होते. आता ते चित्रपटाच्या माध्यमातून देशाचे संस्कृतिक मूल्ये आणि इतिहास सादर करत आहेत. कान्समधील चित्रपट तज्ज्ञांनी ‘१९४६ : डायरेक्ट अॅक्शन डे’ या चित्रपटाला ‘धाडसी आणि कलात्मक’ असे विशेषण दिले आहे.चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी विविध देशांतील चित्रपट निर्माते, इतिहासकार आणि सांस्कृतिक अभ्यासक उपस्थित होते. त्यांनी भारताच्या विसरलेल्या इतिहासावर प्रकाश टाकल्याबद्दल या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.
गर्व आहे
भारत Abhishek Singh आज सांस्कृतिक आघाडीवर जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करत असताना, अभिषेक सिंग यांची ही कामगिरी नव्या भारतीय कथाकारांचा आवाज बळकट करत आहे. ही कान्समधील उपस्थिती केवळ चित्रपट क्षेत्रासाठी नव्हे, तर सार्वजनिक सेवा आणि कलासंस्कृती यांच्या संगमाचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. त्यांच्या या प्रवासाची ही केवळ सुरुवात असून, भविष्यातही अभिषेक सिंग हे प्रभावी चित्रकथांद्वारे देश व समाजाचा आवाज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचवत राहतील, अशी आशा आहे.