पटणा,
Aishwarya Rai राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. तेज प्रताप यांनी अनुष्का यादव नावाच्या तरुणीसोबत विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही अनुष्का हीच तर आहे का जिनचं तेज प्रताप यांच्याशी ऐश्वर्या राय यांच्याशी लग्न होण्यापूर्वी प्रेमसंबंध होते, असा आरोप आता केला जात आहे. यानंतर तेज प्रताप यांची पत्नी आणि सध्या घटस्फोटासाठी न्यायालयात लढा देणाऱ्या ऐश्वर्या राय यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
“सर्व काही सर्वांसमोर स्पष्ट आहे. मला फक्त एवढं विचारायचं आहे की जेव्हा या सर्वांना हे माहित होतं, तेव्हा त्यांनी माझं लग्न का केलं? माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं? त्यांनी मला का मारलं? त्यांचा सामाजिक न्याय तिथे कुठे गेला? ते सर्व एकत्र आहेत. निवडणुका आहेत, म्हणून हे नाटक सुरू आहे,” असं ऐश्वर्या राय यांनी सांगितलं.
“मी Aishwarya Rai मीडियामधूनच सगळी माहिती घेत आहे. अनुष्काबद्दल मला काहीच माहित नव्हतं. आता मला विचारा, माझं पुढे काय? आपण न्यायालयात बोलणार आहोत. मुलाच्या चुका लपवण्यासाठी सर्व दोष नेहमी मुलीवरच टाकला जातो. त्यांनी माझं काय केलं, याचा विचार कुणी करतो का?” असा सवालही ऐश्वर्यांनी उपस्थित केला.यामुळे लालू कुटुंबासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, तेज प्रताप यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी पुन्हा एकदा चर्चांचा कल्लोळ सुरु झाला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे पडसाद राजकीय पातळीवरही उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.