Nagpur-Tarun Bharat : शतकपूर्तीकडे वाटचाल करीत असलेल्या नागपूरच्या ‘तरुण भारत’ने किमान चार ते पाच पिढ्यांचे वैचारिक संगोपन केले. राष्ट्रीय बाण्याचे वैचारिक आणि कौटुंबिक दैनिक ही ‘तरुण भारत’ची ओळख. ती किती घट्ट आहे, याची प्रचीती देणारा प्रसंग नुकताच घडला.
प्रसंग एका नागपूरकराच्या बाबतीत आणि पुण्यात घडलेला. तब्बल तीन दशके नियमित ‘तरुण भारत’ वाचणारे मनोहर नीळकंठ देशपांडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शरयू मनोहर देशपांडे पुण्यात राहायला गेले. तिथे ऑनलाईन ‘तरुण भारत’ वाचता येत असला तरी, छापील वृत्तपत्र हातात घेऊन वाचण्याचे समाधान देशपांडे दाम्पत्याला मिळत नव्हते.

मनोहर देशपांडोंचे व 91 वर्षे असून, ते नागपूरच्या सहकार संस्था कार्यालयातून जिल्हा उपसंचालक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यासोबतच, ते प्रदीर्घ काळ सक्रिय राहिलेले संघ स्वयंसेवक देखील आहेत. गेल्या 6 वर्षांपासून ते पुण्यात स्थाकि झालेले आहेत. वाचन आणि लेखनाने स्वभावातील व जीवनातील तजेला टिकून राहतो, असे त्यांना वाटते. त्यांच्या अर्धांगिनी शरयू देशपांडे 84 वर्षांच्या असून, नागपुरात असतानापासूनच त्या भजनी मंडळांमध्ये सहभागी आहेत. गायनाचा छंद त्यांनी पुण्यातही जोपासला आहे. गृहकृत्यदक्ष शरयू देशपांडे यांचे संस्कृतवर प्रभुत्व असून, त्यांनाही ‘तरुण भारत’ वाचण्याची आवड आहे. पण, शतकपूर्तीच्या वाटेवर असलेला नागपूरचा ‘तरुण भारत’ पुण्यात मिळत नसल्याने त्यांना ऑनलाईनवर भागवावे लागत होते. त्यामुळे हे दाम्पत् वारंवार अस्वस्थ व्हायचे.
देशपांडे दाम्पत्याची ही अस्वस्थता त्यांचे पुत्र आणि उद्योजक प्रशांत देशपांडोंनी ओळखली. अलिकडेच नागपुरात काही कामानिमित्त आले असता त्यांनी ‘तरुण भारत’ कार्यालयाशी संपर्क केला आणि आपल्या माता-पित्यांची अस्वस्थता सांगितली. ‘तरुण भारत’चा छापील अंक आमच्या पुण्यात मिळू शकेल का?, हा त्यांचा प्रश्न होता. वितरण विभागाने हा प्रश्न तात्काळ सोडविला आणि देशपांडे दाम्पत्याला पुण्यात त्यांचा आवडता ‘तरुण भारत’ निमित वाचायला मिळू लागला. त्यांची ही गरज भागवण्यासाठी कात्रज टपाल कार्यालयातील कर्मचाèयांनी विशेषोगदान दिले. आपले आवडते दैनिक निमित वाचायला मिळू लागल्यामुळे देशपांडे दाम्पत्याच्या चेहèयावर विलसणारे समाधान हे ‘तरुण भारत’ परिवाराला बळ देणारे आणि त्याच वेळी वाचनसंस्कृतीच्या बळकटीकरणासाठी आजही प्रयत्न होत आहेत, याचा आनंद देणारे आहे.
हा अनुभव अत्यंत हृद्य आहे. त्यामुळेच ‘तरुण भारत’ परिवाराने 1 जुलै ते 31 डिसेंबर 2025 या आगामी सहा महिन्यांसाठी पुणेकरांसाठी, विशेषतः विदर्भातून पुण्यात स्थायिक झालेल्या मंडळींसाठी खास योजना आखली आहे. ‘तरुण भारत’च्या दैनंदिन अंकासह 3 साप्ताहिक पुरवण्या, दररोज एका विषयाला वाहिलेले फीचर पेज आणि दिवाळी अंक असा नजराणा या योजनेअंतर्गत पुण्यातील वाचकांना आम्ही देऊ. पुण्यात ‘तरुण भारत’ वाचण्यासाठी, तेथील वाचकांनी आपले नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक सोबतच्या चौकटीत दिलेल्या नंबरवर कळवावा. तसेच क्यूआर कोड स्कॅन करून वर्गणी भरावी आणि शंभर वर्षांची परंपरा असलेले वृत्तपत्र घरपोच मिळवावे, असे ‘तरुण भारत’ परिवाराचे आवाहन आहे.
तुम्हालाही हवाय ‘तरुण भारत’?
देशपांडे आजी-आजोबांना तर पुण्यातही त्यांचा आवडता ‘तरुण भारत’ मिळू लागला आहे. तुम्हालाही पुण्यात ‘तरुण भारत’ हवाय?... मग 9881717351 या क्रमांकावर आमचे वितरण विभाग प्रमुख प्रसन्न देशमुख यांच्याशी संपर्क साधा आणि सवलतीच्या दरात आपल्या प्रतीची नोंदणी करा. सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा आणि केवळ 1250 रुपयांत आगामी सहा महिन्यांसाठी (1 जुलै ते 31 डिसेंबर 2025) ‘तरुण भारत’चा दैनंदिन अंक आणि दिवाळी अंक पुण्यात टपालाने प्राप्त करा. यासाठी लागणारा टपाल खर्च ‘तरुण भारत’ परिवार करेल. पुण्यातील वाचकांना ‘तरुण भारत’चे अंक एक दिवस उशिरा मिळणार असले तरी ‘तरुण भारत’ हे विचारपत्र, संस्कारपत्र आहे आणि विचार व संस्कार नेहमीच ताजे असतात!