Tarun Bharat Nagpur शतकी वर्षात पदार्पण करणारा तरुण भारत, नागपूर आता पुण्यातील वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 'वाचन संस्कृतीची शिदोरी जपताना' या शीर्षका अंतर्गत गुरुवार दि. २९ मेच्या तरुण भारत वृत्तपत्रात विदर्भातील पण पुण्यात स्थायिक झालेल्या वाचकांसाठी नियमित तरुण भारत उपलब्ध होणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाले. अक्षरशः शेकडो वाचकांनी हे वृत्त वाचून आनंद व्यक्त केला. सोबतच, आपल्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत तरुण भारताची ही योजना पोहचविणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आमच्या व्हॉट्स ऍप चॅनलवर संदेश लिहन तसेच, सोबत दिलेल्या क्रमांकावर फोन करून, वाचकांनी आपला आनंद व्यक्त केला, 'तरुण भारत हेच खरे वृत्तपत्र। त्यामुळे ज्या घरी हे वृत्तपत्र वाचले जात असेल ते कुटुंब सकारात्मक आणि समाजभान जपणारेच असेल यात शंकाच नसते. लग्नावरच आपली कुटुंब संस्था टिकून आहे. त्यामुळे, कुटुंब संस्था मजबूत आणि सुदृढ राहण्याच्या दृष्टीने मागोवा, आकांक्षा, आसमंत, संपादकीय पृष्ठावरचे सर्व दर्जेदार लेख, फिचर पेजेस आणि विविध विषयांना समर्पित विशेषांक वाचून व्यक्ती जीवनात योग्य ते निर्णय घेऊ शकतात. Tarun Bharat Nagpur ज्यांच्या घरी तरुण भारत ते कुटुंब कधीच नैराश्यग्रस्त होऊच शकत नाही ही खात्री आहे. कारण मेंदूला पोषक असं वाचनीय खाद्य पुरवणारं वृत्तपत्र म्हणजेच आपला तरुण भारता' अशी प्रतिक्रिया नागपुरातील प्रख्यात उद्योजिका गौरी बेलन यांनी आम्हाला लेखी स्वरूपात पाठवली.
अनौपचारिक संवादात त्या म्हणाल्या की, २० वर्षापासून विवाह संस्था आणि लग्न जुळवण्याचे काम करत असल्यामुळे अनेक विदर्भवासी जे पुण्यात स्थायिक झाले त्यांच्याशी नेहमीच संपर्क असतो. पुणेकरांशी संवाद साधताना असं जाणवत होतं की, या सगळ्यांना तरुण भारत निपमित वाचायला मिळायलाच हवा जेणेकरून विदर्भवासी आणि पुणेकर यांच्यातील भावनिक पूल मजबूत होईल. Tarun Bharat Nagpur ही इच्छा तरुण भारताच्या या उपक्रमाने पूर्ण होत असल्याचा आनंद आहे, असेही त्यांनी नमूद केले. यापुढे पुणेकरांशी संवाद साधताना तरुण भारतची ही आकर्षक योजना देखील सांगितल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तरुण भारतच्या या उपक्रमाला शंभर टक्के प्रतिसाद मिळून अगदी अल्पावधीतच पुण्यातल्या घराघरात तरुण भारत पोहोचणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.