नागपूर,
Nagpur News : मान्सून उंबरठ्यावर उभा असल्याने पावसाळ्यात हाेत असलेल्या गैरसाेयीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व खाेदलेले रस्ते 31 मे पर्यंत दुरुस्त करून पूर्ण करण्याचे आदेश मनपा आयुक्त डाॅ. अभिजित चाैधरी यांनी मनपा अभियंते आणि संबंधित कंत्राटदारांना दिले हाेते. ती मुदत आज पूर्ण झाली असली तरी शहरातील अनेक भागातील रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई हाेणार का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

महानगरपालिकेर्ते शहरातील विविध भागांत सिवर लाईन, पिण्याच्या पाण्याची लाईन यासह इतरही कामांसाठी रस्त्यांचे खाेदकाम सुरू आहे. ही सर्व कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अभियंते आणि कंत्राटदारांना दिले हाेते. ते न केल्यास दंड ठाेठावण्याचा इशाराही बैठकीत दिला हाेता. पण आजठघडीला शहरातील काचीपुरा, गणेशपेठ बसस्थानक, बजाजनगर, अलंकारचाैैक मेडिकल चाैैक यासह अनेक भागात ठिकठिकाणी विविध कामांसाठी रस्ते खाेदण्यात आले असून ती कामे पूर्ण न झाल्याने खड्डे, नाल्या अद्यापही तशाच आहेत. त्यातच अध्येमध्ये पावसाची हजेरी सुरू असून खाेदलेल्या कामांचा गाळ रस्त्यांवर पसरत आहे. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. तसेच कामे अपूर्ण असल्याने अनेक ठिकाणी माेेठमाेठे सिमेंटचे पाईप रस्त्याच्या कडेला पडून आहेत. परिणामी वाहतूक काेंडी वाढून अपघाताचा धाेकाही वाढला आहे.
पिण्याच्या पाईपलाईनसाठी खाेदकाम सुरूच
पालिकेद्वारे पावसाळ्यापूर्वी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यासंदर्भातील कामांचाही समावेश आहे. ही कामेही 31 मे पर्यंत पूर्ण हाेणे गरजेचे हाेते. परंतु अनेक ठिकाणी ती अपूर्णच असून खाेदकाम सुरूच आहे. यामुळे अनेक भागात रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या उद्भविली आहे.
बसस्थानक परिसरात वाहतुकीची काेंडी
गणेशपेठ बसस्थानक परिसरात खाेदकाम अपूर्ण असून बसस्थानकांमुळे येथे बसेससह इतरही प्रवासी वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वाहतूकीचा खाेळंबा तसा नित्याचाच असला तरी चाेकातील खाेदकामामुळे काेंडीची समस्या वाढली आहे. कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवासी वर्गातून हाेत आहे.