नवी दिल्ली,
IndiGo flights cancelled पाकिस्तानसोबत वाढत्या तणावादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून, देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने १० शहरांमधून उड्डाणे रद्द केली आहेत. आता १० मे रोजी रात्री २३:५९ पर्यंत या शहरांमधून कोणतीही उड्डाणे उपलब्ध राहणार नाहीत.
इंडिगोने एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुमची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे, श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाला, बिकानेर, जोधपूर, किशनगड आणि राजकोट येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमान उड्डाणे १० मे २०२५ रोजी रात्री २.५९ वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. IndiGo flights cancelled आम्ही यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि सर्व अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधत आहोत. आम्ही तुम्हाला अधिकृत अपडेट्सद्वारे माहिती देत राहू आणि तुमच्या प्रवासाच्या योजनांमध्ये बदल करण्यास मदत करण्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत. तुमच्या समजुती आणि संयमाबद्दल धन्यवाद.