"महाभारत" आमिर खानचा शेवटचा चित्रपट ठरणार?

"सितारे जमीन पर"नंतर आमिरचा स्वप्नातील भव्य प्रकल्प

    दिनांक :01-Jun-2025
Total Views |
मुंबई :
Aamir Khan बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आपल्या आगामी चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. 'सितारे जमीन पर' या चित्रपटानंतर तो आपल्या स्वप्नातील प्रकल्प 'महाभारत'वर काम सुरू करणार असल्याचे त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. विशेष म्हणजे, 'महाभारत' हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरू शकतो, असा संकेतही आमिरने दिला आहे.
 
 

Aamir Khan  
अभिनेता आमिर म्हणाला, "'महाभारत' ही माझ्यासाठी केवळ एक कथा नाही, ती एक भावना आहे. ती थरांमध्ये विभागलेली आहे, त्यात भावना आहेत, ती विशाल आहे. जगात जे काही आहे, ते सगळं महाभारतात आहे." ही कथा तो खूप आधीपासून मोठ्या पडद्यावर आणू इच्छित होता, असेही आमिरने स्पष्ट केले.या चित्रपटानंतर आपण आणखी काही करावं की नाही, याविषयी विचारल्यावर आमिर म्हणाला, "कदाचित 'महाभारत'नंतर मला वाटेल की आता करायचं काही उरलेलं नाही. मला आशा आहे की मी शेवटपर्यंत काम करत राहीन, पण या चित्रपटानंतर कदाचित मी समाधानी होईन."
 
 
विशेष बाब Aamir Khan  म्हणजे, आमिर स्वतः या चित्रपटात अभिनय करेल की नाही, यावरही त्याने स्पष्टता दिली आहे. "'महाभारत' हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चित्रपट असेल. या प्रकल्पासाठी कथा लिहिण्यातच अनेक वर्षे जातील. मी स्वतः यात काम करणार की नाही, हे निश्चित नाही. आम्ही प्रत्येक पात्रासाठी योग्य अभिनेता शोधू."आता आमिर खानचा हा स्वप्नातील 'महाभारत' प्रकल्प प्रत्यक्षात कधी येतो आणि त्याचा भारतीय सिनेसृष्टीवर काय प्रभाव पडतो, हे पाहणे रंजक ठरेल. मात्र इतकं निश्चित की, हा चित्रपट केवळ एक मनोरंजनपर अनुभव न राहता, एक संस्कृतिक पर्व ठरू शकतो.