वर्धा,
Mahavir Children's Park बाहेर गावाहून आलेल्या पाहुण्यांना मनोरंजन म्हणून दाखवायला वर्धेत अजून तसे काही तयार झाले नाही. सेवाग्रामचा गांधी आश्रम आणि पवनारचा परमधाम तेवढेच काय तेच! बच्चे कंपनीला २ तास विरंगुळा म्हणून असे काही सध्या वर्धेत निर्माण झाले नाही. शहरात बगीचांचा वानवाच आहे. जे काही महावीर उद्यान काही वर्षांपूर्वी तयार झाले होते तेही आता जैसे थेच्या मार्गावर आले आहे. लहान मुलांसाठी असलेले खेळणे तुटले आहेत. वॉटल टँकमध्ये बेडकं उड्या मारत आहेत. पण, याकडे ठेकेदार आणि नगर पालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येते.

वर्धा शहरात एका बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि दुसर्या बाजूला मध्यवस्तीत महावीर बालोद्यान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दशा गेल्या तीन वर्षात सुधारली तर त्याच काळात महावीर बालोद्यानही! नगर पालिकेच्या अख्य्त्यारीत येत असलेल्या महावीर उद्यानात कुत्रेही फिरकत नव्हते. परंतु, वर्धेतील जनहित मंच या संघटनेने पुढाकार घेऊन त्या जंगलाला उद्यानात आणले. Mahavir Children's Park त्यानंतर नगर पालिकेने ते खाजगी ठेकेदाराला चालवण्यासाठी दिले. आज त्या उद्यानाची परिस्थिती पुन्हा मागचे पाढे पंचावन्न सारखी झाली आहे. दुपारी प्रेमी युगलांना मुत संचार असलेल्या या उद्यानतील खेळणी सडू लागली आहेत. ज्या वॉटर टँकमध्ये लहान मुलांना छोट्या बोट सायकलमध्ये बसवले जाते त्यातील पाण्यात शेवाळ झाला असुन बेडकं उड्या मारतात. झुल्याची पाटी तुटून कधीही अपघात होऊ शकतो तर व्यायामासाठी लावलेले साहित्य आवाज करू लागले आहेत. येथे पहाटे व्यायामासाठी येणार्या महिला व पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, त्या व्यायामाच्या साहित्याचे रबरं वगैरे तुटले असल्याने तेथेही अपघात होण्याची शयता नाकारता येत नाही.
कॅमेर्याला ५० रुपये
आजकाल जाऊ तिथे फोटो ही फॅशन झाली आहे. मोबाईलने ते स्वस्त करून टाकले आहे. परंतु, काही हौसी पालक याच महावीर उद्यानात मुलांचे वाढदिवस साजरे करताता. Mahavir Children's Park त्यासाठी प्रोफेशनल छायाचित्रकारालाही बोलवतात. येथे १० रुपये प्रवेश फि आहे. परंतु, कॅमेरा सोबत आणल्यास ५० रुपये अतिरित घेतल्या जातात. मोबाईलने फोटो काढायला सुट आणि कॅमेर्यालाच ५० रुपये का असा प्रश्न प्रसिद्ध छायाचित्रकार राहुल तेलरांधे यांनी उपस्थित केला आहे.