मुंबई,
Sunita Ahuja बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी अलीकडेच एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील स्टार पत्नी म्हणून आलेल्या आव्हानांबाबत मन मोकळं केलं. ‘इन्स्टंट बॉलीवूड’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले वैयक्तिक अनुभव मांडत म्हटले, "हिरोची पत्नी असल्यास तुमचं दगडाचं मन असणं आवश्यक आहे. कारण नायक आमच्यापेक्षा नायिकांसोबतच अधिक वेळ घालवतात."

सुनीता यांनी Sunita Ahuja स्पष्टपणे सांगितले की, जेव्हा त्यांनी आपल्या दोन मुलांना – टीना आणि यशवर्धन यांना जन्म दिला, तेव्हा गोविंदा सतत शूटिंगमध्ये व्यस्त असायचा. त्या काळात त्यांनी आपली सासू आणि कुटुंबाच्या पाठिंब्यानेच हे कठीण दिवस पार केले."जेव्हा मी बाळंतपण केले तेव्हा गोविंदा घरात क्वचितच असायचा. मी माझ्या सासूबाईंसोबत राहत असे. लहान बाळांना घेऊन प्रवास करणं शक्य नव्हतं. पण अशा वेळी नवऱ्यावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं," असं त्यांनी नमूद केलं.सुनीता यांनी हेही सांगितले की, गोविंदाशी लग्न करताना त्या फार लहान होत्या आणि त्यानंतर त्यांनी सलग १३ वर्षे आपल्या सासूबाईंसोबत राहून संसाराचा प्रवास सुरू ठेवला. "माझ्या सासूबाईंनी मला खूप काही शिकवलं. गोविंदा त्याच्या आईवर फार प्रेम करत असे आणि त्याने कधीही चुकीचा मार्ग अवलंबला नाही," असं त्या भावनिक होत म्हणाल्या.
गोविंदा Sunita Ahuja आणि सुनीता यांचं लग्न १९८७ मध्ये झालं. आज ते आपल्या दोन मुलांचे – टीना आणि यशवर्धनचे – अभिमानी पालक आहेत.सुनीता यांचे हे वक्तव्य अनेक महिलांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील संघर्षांबाबत नवा दृष्टिकोन देणारे ठरू शकते. स्टारच्या पत्नीचीही एक वेगळीच कहाणी असते, हे त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं आहे.