- डॉ. दीपक शिकारपूर
technology इलेक्ट्रॉनिक युगाच्या सुरुवातीपासून (सुमारे 1970) गेल्या 45 वर्षांमध्ये सर्वाधिक वेगाने प्रसार झालेले उपकरण म्हणजे सेलफोन. या बाबतीत त्याने संगणकाला केव्हाच मागे टाकले. किंबहुना, हँॅण्डसेटमध्येच आता परिपूर्ण संगणक समाविष्ट झाला आहे. आता सेलफोन हवा असण्याच्या गरजेचे रूपांतर वेडामध्ये झाले आहे. इतके की, रोटी-कपडा-मकानसारख्या जीवनावश्यक गोष्टींमध्येच लोक आता कळत-नकळत सेलफोनचाही समावेश करू लागले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये मोबाईल फोनच्या हॅण्डसेटचे स्वरूप किती बदलले हे सांगायला नकोच. हॅण्डसेट लहान आणि हलके बनले आणि मुख्य म्हणजे त्याद्वारे मिळणाऱ्या सुविधांमध्ये आश्चर्यकारक वेगाने वाढ झाली. सध्या प्रत्येकाच्याच हाती स्मार्टफोन्स दिसू लागल्याने हॅण्डसेटवरून ‘लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडीओ’ पाहणाऱ्यांची संख्या विलक्षण वाढणार आहे. 6जी हे पुढील पिढीचे वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे, जे 5जीपेक्षा खूपच वेगवान, अधिक विश्वासार्ह आणि अनेक नवीन क्षमतांसह येणार आहे. हे तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात क्रांती करेल. ‘6 जी’ म्हणजे नक्की काय हे समजण्यासाठी आपल्याला मोबाईलचा इतिहास समजून घ्यावा लागेल. यातील ‘जी’ म्हणजे ‘जनरेशन’. आपण याला आपल्या भाषेत पिढी अथवा आवृत्ती म्हणू.
सेल्युलर मोबाईल सेवा सर्वांत आधी रेडिओ टेक्नोलॉजी वापरत असे. तीच ‘फर्स्ट जनरेशन’ मानले जाते. त्यावरून फक्त कॉल करता येत असत. त्यानंतर रेडिओ टेक्नॉलॉजी नेटवर्कचे डिजिटल नेटवर्कमध्ये रूपांतर झाले. त्याला 2 जी असे संबोधले जाते. 2 जी मध्ये इंटरनेटची सुविधा नव्हती. 2 जीने एसएमएस (शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस) या सुविधेचा प्रथम वापर सुरू केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पसरल्या गेलेल्या आणि अधिक चांगल्या सोयी जास्त वेग व संपूर्ण सुधारित आवृत्तीला 3 जी म्हणता येईल. इंटरनेट मोबाईलवर आले ते 3 जीमुळे. स्मार्टफोनच्या आगमनानंतर लोक डेटा मोठ्या प्रमाणावर वापरायला लागले. त्यामुळे अधिक जलद इंटरनेटची गरज भासू लागली. त्यातून 4 जी नेटवर्कचा जन्म झाला. मोबाईल नेटवर्कच्या या चौथ्या आवृत्तीतील मुख्य सुधारणा म्हणजे अधिक जलद इंटरनेट सुविधा. 5 जी तंत्रामुळे आपण फक्त स्मार्टफोन नव्हे तर, सर्व उपकरणे जोडू लागलो. 5 जी मोबाईल नेटवर्कमध्ये खूप जास्त बॅण्डविड्थ उपलब्ध होईल आणि मोबाईल इंटरनेट अतिशय जलद असल्याचा अनुभव येईल. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या संकल्पनेमुळे आता जवळजवळ प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरण इंटरनेटला जोडले जात आहे. स्मार्टफोनप्रमाणेच इतरही अनेक वस्तू आणि उपकरणे हुशार झाली असून इंटरनेट, ब्ल्यूटूथ, निअर फ्रीक्वेन्सी (एनएफ) इ. मार्गांनी परस्परांशी संवाद साधू लागली.technology वापरकर्त्याने आपल्या विशिष्ट गरजा एकदा स्मार्ट उपकरणांना सांगितल्या की ती उपकरणे एकमेकांशी ‘बोलून’ स्वतःच निर्णय घेऊ शकतात.
आता 6 जी कडे वळू. 6 जीची गती 5 जीपेक्षा अनेक पट जास्त असणार आहे. 6 जी हे एक अत्यंत वेगवान, अविश्वसनीय आणि अत्यंत सुरक्षित वायरलेस कम्युनिकेशन स्टॅण्डर्ड आहे. हे आपल्याला उच्च-गुणवत्तेचे व्हिडीओ कॉलिंग, आभासी वास्तविकता, ऑगमेंटेड रियलिटी आणि इंटरनेट ऑफ थिंग्जसारख्या अनेक तंत्रांचा व्यावहारिक अनुभव देऊ शकेल. टेराहर्ट्ज तरंगांचा वापर करून 6 जी सेवा अधिक डेटा प्रवाहित करण्यास सक्षम असेल. नेटवर्क स्लाईसिंगमुळे नेटवर्कला वेगवेगळ्या अनुप्रयोगांसाठी ऑप्टिमाइझ केले जाऊ शकते. 6 जी तंत्रज्ञान खूपच जटिल आहे आणि त्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन आवश्यक आहे. नोकिया, एरिक्सन, हुआवेई आणि सॅमसंग हॅण्डसेट उत्पादक किंवा सेवा प्रदाते 6 जीवर चालू शकणाèया मूलभूत अत्यावश्यक प्रणाली विकसित करण्यात अग्रेसर आहेत. 6 जी तंत्रज्ञान नवीन रेडिओ फ्रिक्वेन्सीवर कार्य करेल आणि लक्षणीय वेग, अधिक कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करेल. 6 जी उद्योग आणि तंत्रज्ञान इकोसिस्टिम खरोखरच जागतिक आहे. सध्याचे प्रमुख 6 जी संशोधन प्रकल्प जपान, अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, जर्मनी, फिनलंड आणि विस्तीर्ण युरोपियन युनियनमध्ये होत आहेत. त्यातले नवीन नाव म्हणजे आपला भारत. हे सर्व प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मोबाईल काँग्रेसमध्ये मोठी घोषणा केली. दूरसंचार विभागाने ‘भारत 6 जी व्हिजन’ तयार करण्यासाठी तंत्रज्ञान अभिनव गट स्थापन केला आहे.
2030 पर्यंत भारतात 6 जी तंत्रज्ञान विकसित करण्याचे धोरण आहे. या व्हिजनचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे 6 जी नेटवर्क तंत्रज्ञान तयार आणि तैनात करणे; जे सुरक्षित, बुद्धिमान आणि व्यापक कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि नागरिकांना चांगले जीवन जगण्यास सक्षम करेल. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, टेलिकॉम मानकांच्या विकासावर देखरेख करणारी आणि जगभरातील स्पेक्ट्रम आणि सॅटेलाईट ऑर्बिट रिसोर्सेसचे व्यवस्थापन करणारी संयुक्त राष्ट्रांची संस्था आहे. या संस्थेने 6 जी व्हिजन फ्रेमवर्क स्वीकारले आहे. 6 जी प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये राबवण्याचा प्रस्ताव आहे. पहिला टप्पा 2023 ते 2025 दरम्यान आकाराला येईल. पहिल्या टप्प्यात अन्वेषणात्मक कल्पना, संघर्षमय तंत्र विकास आणि संकल्पनेचा पुरावा चाचण्यांना समर्थन प्रदान केले जाईल. दुसरा टप्पा 2025 ते 2030 या काळात आकाराला येईल. जागतिक समविचारी गटाद्वारे स्वीकृतीसाठी वचन आणि क्षमता दर्शवणाèया संकल्पनांना 6 जी प्रकल्पाच्या व्यावसायिकीकरणाकडे नेणारे अंमलबजावणीत्मक समर्थन दिले जाईल. 6 जी साठी पायाभूत सुविधांमध्ये भरीव गुंतवणूक आवश्यक आहे.technology उदाहरणार्थ, वेव्ह प्रसारित करणे आणि प्राप्त करणे अधिक कठीण आहे. त्यामुळे 6 जी नेटवर्कला नवीन अँटेना डिझाईन आणि सिग्नल प्रक्रिया तंत्र वापरण्याची आवश्यकता असेल. सहाव्या पिढीचे वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञान उच्च कव्हरेज, कमी ऊर्जेचा वापर, सर्वसमावेशक स्पेक्ट्रम आणि सुधारित सुरक्षिततेसह किफायतशीरपणा प्रदान करेल असा अंदाज आहे
विस्तारित वास्तविकता आणि मिश्रित वास्तविकता मोबाईलच्या या सहाव्या पिढीचा भाग असेल. शंभरच्या आसपास फ्रिक्वेन्सीवर 6 जी ऑपरेट करते. हे संवेदनांचे इंटरनेट आहे, भौतिक आणि आभासी जगाचे संमिश्रण हे 6 जीचे वैशिष्ट्य आहे. पुढील दशकात स्मार्ट उपकरणांना आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) या तंत्रामुळे सर्वत्र इंटरनेट बॅण्डविड्थ लागेल. इथेच 6 जी कामाला येईल. यामुळे मोबाईल कॉल्स वेगळ्या दर्जाचा अनुभव देतील. आता आपण द्विमिती व्हिडीओ जमान्यात आहोत. 6 जीमुळे मानवी आकाराचे 3 डी होलोग्राम प्रदर्शन शक्य होते. आपण संपर्क साधत असू शकणाèया व्यक्ती रिअल टाईममध्ये (जशा आहेत तशा; प्रोफाईल चित्र नव्हे) आपल्याजवळ प्रकट होतात.technology अनेक पौराणिक टीव्ही मालिकांमध्ये मानवाच्या समोर देवदेवता प्रकट झाल्याचे दाखवले जाते. 6 जी होलोग्राम तंत्रामुळे हे तंत्र सर्वसामान्यांना उपलब्ध होईल. यामुळे दळणवळण क्षेत्रात क्रांती होईल. 2026 च्या मध्यास हे प्रायोगिक तत्त्वावर सुरू होईल आणि 2030 पर्यंत सर्वत्र उपलब्ध होईल. त्यामुळे पारंपरिक द्विमिती मोबाईल फोनचा नक्कीच अस्त होईल. आपण 6 जी तंत्रज्ञान यशस्वीरीत्या कार्यान्वित केल्यास देशाला एक तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत राष्ट्र बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकू. भारताला वैश्विक स्तरावर एक तंत्रज्ञान नेता देश म्हणून प्रस्थापित करण्यात 6 जी तंत्रज्ञान मदत करेल. विसाव्या शतकात आपली प्रतिमा तंत्रज्ञान आयातदार देश अशी होती. आता आपण प्रगत व निर्यातप्रधान म्हणून ओळखले जाऊ आणि हीच या नवतंत्रज्ञानाची खासियत असेल.
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)