अमरावती,
Amravati Crime News परिचित तरुणांमध्ये आपसात सुरू असलेल्या वादात मध्यस्थीसाठी गेलेल्या एका २९ वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी मुख्य मारेकर्यासह तिघांना शनिवारी पहाटे अटक केली आहे. निखिल सुभाषराव थोरात (२९, रा. महात्मा फुले नगर नवसारी, अमरावती) असे मृतक तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी हिमांशू उर्फ दद्दू राजू छेत्री (२३, रा. उज्ज्वल कॉलनी), यश ओमप्रकाश कनोजिया (२१, रा. हर्षराज कॉलनी) आणि जयेश ऊर्फ तात्या राजेंद्र गायकवाड (२०, रा. नवसारी गावठाण, अमरावती) या तिघांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, निखिल हा मजुरीचे काम करतो. शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर निखील घराबाहेर पडला. त्यावेळी त्याने घरी सांगितले कि, तो बॅनर चिपकवण्याच्या कामासाठी जात आहे. दरम्यान रस्त्यावर आल्यानंतर त्याला दिसले कि, हिमांशू, यश, जयेश यांचा त्यांच्याच काही परिचित मित्रांसोबत वाद सुरू आहे. Amravati Crime News निखील सुध्दा या सर्वांच्या परिचित होताच. त्यामुळे निखीलने त्यांच्यात सुरू असलेल्या वादात मध्यस्थी केली. या कारणातून हिमांशूने धारदार चाकू थेट निखिलच्या मानेत खूपसला. चाकूच्या एकाच घावात निखिल रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला.
त्यानंतर निखिलच्या मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून निखिलला मृत घोषित केले. चाकूचा घाव इतका गंभीर होता कि, अति रक्तस्त्राव झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणेदार दिनेश दहातोंडे, एपीआय बाबर पथकासह घटनास्थळी दाखल झाले. Amravati Crime News पोलिसांनी मारेकर्यांची माहिती घेतली असता हिमांशू, यश आणि जयेश या तिघांची नावे समोर आली. ते पसार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या चार तासात त्यांना अटक केली. या प्रकरणात निखिलचा भाऊ शुभम थोरात यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.