मुंबई,
Aamir Khan बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा दंगल हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला आणि जगभरात प्रचंड गाजला. पण हा ब्लॉकबस्टर चित्रपट पाकिस्तानात मात्र प्रदर्शित झाला नाही. आता आमिर खानने स्वतः यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
अलिकडेच आमिर खान आप की अदालत या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याने सांगितलं की, "दंगल प्रदर्शित करताना पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना भारतीय राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचे दृश्य चित्रपटातून हटवण्याची अट घातली होती. मला हे कळताच मी एका क्षणही विचार न करता ठरवलं की हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करायचा नाही."आमिर पुढे म्हणाला, "निर्मात्यांनी मला सांगितलं की यामुळे आपल्या व्यवसायावर परिणाम होईल. पण मी स्पष्ट केलं की, जर कोणी मला माझ्या चित्रपटातून भारतीय राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत काढून टाकायला सांगत असेल, तर मला असा व्यवसाय नको आहे."
दरम्यान, Aamir Khan भारतातही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आहे. यंदाच्या एप्रिलमध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही बंदी घालण्यात आली.आमिर खानने ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, "ऑपरेशन सिंदूरच्या नायकांना सलाम. आपल्या सशस्त्र दलांचं धाडस, शौर्य आणि देशाच्या सुरक्षेसाठीची निःस्वार्थ वचनबद्धता यासाठी मनापासून आभार. पंतप्रधानांचे नेतृत्व आणि संकल्पाबद्दल धन्यवाद. जय हिंद."कामाच्या आघाडीवर, आमिर खान सध्या त्याच्या आगामी सितारे जमीन या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २० जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.