तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Yavatmal News : पांढरकवडा परिसरात नैसर्गिक आपत्तीमुळे खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने युद्धपातळीवर प्रयत्न करून यश मिळवले आहे. जोरदार वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज वाहिन्या आणि वीज खांब तुटले होते. परिणामी संपूर्ण परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता, अशी माहिती कार्यकारी अभियंता नरेंद्र कटारे यांनी दिली आहे.
आपल्या घरातील वीज बटन दाबल्याबरोबर सुरू होतो. तथापि ही वीज ग्राहकापर्यंत पोहचण्यासाठी महावितरणच्या वीज वाहिन्यांचा शेकडो किमी प्रवास करावा लागतो. त्यामुळे चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीत वीज वाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे वाहिन्या क्षतीग्रस्त होतात. तसेच अनेक वीजखांब जमीनदोस्त होतात आणि वीजपुरवठा खंडित होतो.
महावितरणच्या 33 केव्ही पारवा उपकेंद्राला आपत्कालीन परिस्थितीत एक वाहिनी बंद पडली तर दुसèया वाहिनीद्वारे वीजपुरवठा करता यावा म्हणून 132 केव्ही घाटंजी आणि 132 केव्ही पांढरकवडा या दोन अतीउच्चदाब उपकेंद्रातून 33 केव्ही वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात आला.
परंतु मंगळवार, 10 जूनला झालेल्या वादळामुळे पारवा उपकेंद्राला वीजपुरवठा करणाèया दोन्ही वाहिन्यांवर अनेक ठिकाणी झाडे पडली होती. त्यामुळे 33 केव्ही पारवा उपकेंद्राचा वीज पुरवठा बंद झाल्याने या उपकेंद्रावरील 38 गावांचा वीजपुरवठा बंद पडला होता.
या वादळामुळे 33 केव्ही पारवा उपकेंद्रातून निघणाèया 11 केव्ही वीज वाहिन्या आणि लघुदाब वाहिन्यांवरही अनेक ठिकाणी झाडे तुटून पडली होती. महावितरणचे अभियंते आणि तांत्रिक कर्मचाèयांनी त्वरित धाव घेत नुकसानग्रस्त वीज संरचना दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले.
प्रथम 33 केव्ही पारवा उपकेंद्र सुरू करण्यासाठी 33 केव्ही वीज वाहिन्यांवरील झाडे हटवणे, तुटलेल्या वाहिन्या आणि खांबांचे पुनर्स्थापन करणे, तसेच वीज प्रवाह सुरळीत करण्यासाठी लागणारे सर्व तांत्रिक उपाय अवलंबण्यात आल्यानंतर दुसèया दिवशी 11 जूनला 3.40 वाजता पारवा उपकेंद्र आणि पारवा गावातील चार रोहित्रे सुरू करण्यात आली.
त्यानंतर 12 जूनला पारवा व कुर्ली या वाहिन्यांवरील पूर्ण 20 गावांचा आणि 11 केव्ही जांब गावठाण वाहिनीवरील एकूण 5 गावांचा आणि 13 जूनला जांब वाहिनीवरील उर्वरित 13 गावांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात महावितरणला यश आले.
वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने मारेगाव तालुक्यात 33 केव्हीचे 18 खांब, 11 केव्हीचे 52 वीज खांब आणि लघुदाब वाहिनीचे 34 वीज खांब पडल्यामुळे खंडित झालेला सर्वच गावांचा वीजपुरवठा महावितरणच्या युद्धस्तरावरील प्रयत्नांमुळे पूर्ववत करण्याला यश मिळाले आहे.
वणी आणि झरी तालुक्यातही वादळ वाèयाचा मोठा फटका महावितरणला बसला आहे. 33 केव्हीचे 2, तसेच 11 केव्हीचे 32 आणि लघुदाब वाहिनीचे 44 वीज खांब आणि शेकडो किलोमिटर वाहिन्या तुटल्यामुळे खंडित झालेला मुकुटबन वितरण केंद्र अंतर्गत गावांचा वीजपुरवठा महावितरणच्या रात्र-दिवस सुरू असलेल्या युद्धस्तरावरील प्रयत्नांमुळे पूर्ववत झाला आहे.
मुख्य अभियंता अशोक साळुंके यांचे महावितरणच्या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष असून आपात्कालिन नैसर्गिक परिस्थितीत खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. विजेपुढे चुकीला माफी नाही त्यामुळे या काळात वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केले आहे.