मुंबई,
Aamir Khan ‘लाल सिंग चड्ढा’ नंतर काही काळ ब्रेक घेतलेला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आता पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यासाठी आमिर सध्या जोरदार प्रमोशन करत आहे. प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबरोबरच अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ला, धर्म आणि त्याच्यावर होत असलेल्या आरोपांवरही मोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.
दहशतवाद्यांवर Aamir Khan रोष व्यक्त करताना आमिर म्हणाला, “संपूर्ण जगाला हे समजलं पाहिजे की सुरुवात त्यांनी केली होती. त्यांनी आमच्या लोकांना मारलं होतं. ही कोणती पद्धत आहे? हा माणुसकीवरच हल्ला आहे. त्यांना याची लाज वाटली पाहिजे. कोणताही धर्म असं सांगत नाही की निरपराध लोकांना मारावं. मी तर दहशतवाद्यांना मुस्लीम मानत नाही. इस्लाममध्ये लिहिलं आहे की तुम्ही महिलांवर हात उचलू शकत नाही, लहान मुलांना मारू शकत नाही, कोणत्याही निरपराध व्यक्तीचा जीव घेऊ शकत नाही. हे सर्व इस्लामच्या शिकवणीच्या विरोधात आहे.”
22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोरांनी धर्म विचारून पर्यटकांवर हल्ला केला होता. या घटनेवर आमिरने आपलं मत व्यक्त केलं.सैन्यावरचा गर्व व्यक्त करत आमिर म्हणाला, “मला माझ्या सैन्यावर अभिमान आहे. जेव्हा कारगिल युद्ध झालं आणि आपण ते जिंकलो, तेव्हा माझ्या माहितीनुसार मी एकटाच असा होतो जो 8 दिवस कारगिलमध्ये राहून सर्व रेजिमेंट्सची भेट घेतली होती. मी त्यांना प्रोत्साहन द्यायला तिथे गेलो होतो.”
आमिर Aamir Khan खानवर त्याच्या चित्रपटांतून हिंदू धर्माची खिल्ली उडवल्याचा आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, “मी प्रत्येक धर्माचा सन्मान करतो. मी माझ्या चित्रपटांतून हिंदू धर्माचा अपमान केलेला नाही. मी फक्त त्या लोकांबद्दल प्रश्न उपस्थित करतो जे धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करतात.”आमिर खानच्या या वक्तव्यामुळे त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट आणि तो स्वतः पुन्हा चर्चेत आला आहे.