‘चंद्र नभीचा ढळला’...ताे अंगणी उगवलाच नाही

मास्तरांच्या जन्मशताब्दी वर्षारंभीही त्यांच्या नावाचा विसर का पडावा

    दिनांक :15-Jun-2025
Total Views |
पराग मगर,
नागपूर, 
Nagpur News : नागपूरसह विदर्भच नाही तर महाराष्ट्राच्या नाट्यसृष्टीचे सुवर्णपान ज्यांच्याशिवाय अपुरेच राहील असे रंगभूमीचे लाडके मास्तर सिद्दहस्त नाट्यलेखक आणि दिग्दर्शक पुरुषाेत्तम व्यंकटेश दारव्हेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला नुकतीच सुरुवात झाली. पण या शंभर वर्षात मास्तरांच्या नावाचे नाट्यगृह किंवा स्मारक तर साेडा त्यांच्या नावाचा साधा चाैकही त्यांच्या जन्मभूमीत म्हणजेच नागपुरात नाही. शंभर वर्षातही त्यांच्या नावाचा विसर महाराष्ट्राला का पडावा अशी प्रश्नवजा खंत त्यांचे सुपुत्र ज्येष्ट नाट्यलेखक व दिग्दर्शक रंजन दारव्हेकर यांनी व्यक्त केली.
 
 
 
JKJ
 
 
 
मास्तरांच्या जन्मशताब्दी वर्षारंभाचे औचित्य साधून तरुण भारतने रंजन दारव्हेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मास्तरांच्या आयुष्यातील ज्ञान-अज्ञात अशा गाेष्टींना उजाळा दिला. दहावीत मास्तर मेरीट हाेते. बीएससी झाले हाेते. शिक्षक तर हाेतेच पण वकीलही हाेते. एमबीबीएसच्या दुसèया वर्षापर्यंतही ते शिकले हाेते. मराठीत एम. ए करीत असताना प्रा. राम शेवाळकर हे त्यांचे वर्गमित्र हाेते. विद्यापीठात शेवाळकर प्रथम तर मास्तर दुसरे आले हाेते.
 
 
 
दारव्हेकर मास्तरांनी स्वतःला नाटकासाठी वाहून दिले हाेते. त्यांनी चंद्र नभीचा ढळला, काळी माती खरे पाणी, चार कथा एक व्यथा, पृथ्वी गाेल आहे, नयन तुझे जादूगार, घनःश्याम नयनी आला, अबाेल झाली सतार, मेरुमंदार धाकुटे, वेदनेचा वेद झाला, वèहाडी माणसं आणि कट्यार काळजात घुसली ही नाटके लिहिली. कल्पनेचा खेळ, जावईशाेध, पप्पांचा महाल, काबुली वाला या एकांकिकासह आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी जवळपास 700 श्रृतिका लिहिल्या. तरीही ते म्हणायचे मी लेखक नाही. मी दिग्दर्शन आणि मास्तर. आणि याप्रमाणेच ते रंगभूमीवरील शेवटचे मास्तर राहिल्याचे रंजन दारव्हेकर सांगतात.
 
 
 
नाटकांसाठीच त्यांनी मुंबई गाठली आणि नाटकाचा नवा अंकच त्यांच्या रुपाने महाराष्ट्र रंगभूमीला मिळाला. अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्या नाटकांनी प्रथम क्रमां क पटकाविले आणि नागपूरचा दबदबा निर्माण केला. तरीही शतकाेत्तरी वर्षात त्यांच्या नावाचे असे काहीही शासनाला आजवर करावेसे वाटले नाही ही शाेकांतिका असल्याचे रंजन दारव्हेकर म्हणतात.
 
 
मास्तर ना मुंबईचे झाले ना नागपूरचे
 
 
मास्तरांची नाटके पाहत नागपुरातील अनेक पिढ्या घडल्या. अनेक राजकीय पुढाèयांनी त्यांच्या नावाचे नाट्यगृह तयार करण्याची आधी इच्छा व नंतर आश्वासने दिली. परंतु आजही ती पूर्ण झाली नसल्याचे रंजन दारव्हेकर सांगतात. प. वसंतराव देशपांडे हे शंकरराव सप्रे यांच्याकडे काही दिवस नागपुरात शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेण्यासाठी आले. एवढाच त्यांचा नागपूरही संबंध. त्यांच्या नावाने नागपुरात सभागृह आहे. राम गणेश गडकरी उपचाराकरिता सावनेरमध्ये आले आणि 28 दिवसात त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीत तिथे नाट्यगृह बांधले गेले. सुरेश भट अमरावतीचे. पण त्यांच्या स्मृतीत नागपुरातील सभागृहाला नाव दिले गेले. मग 1967 पासून पुढे 30 वर्ष मास्तर मुंबईत स्थायिक हाेऊन रंगभूमीची सेवा करीत राहिले. पण मुंबईतही त्यांच्या स्मृतीत काहीही नाही. त्यामुळे मास्तर ना नागपूरचे झाले ना मुंबईचे.